HW News Marathi
राजकारण

हिटलरशाही आणण्याचा प्रयत्न केला जात आहे !

जेजुरी। “हिटलरशाही आणण्याचा प्रयत्न केला जात” असल्याचा आरोप भारिपचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी जेजुरीत केला आहे. पुढे ते असे देखील म्हणाले की, “वंचित समाजाने वेळीच सावध होऊन एकत्र येण्याचे आवाहन” देखील त्यांनी उपस्थितांना केले. वंचित समाजावर वर्चस्व टिकवण्यासाठीच विचारवंतांच्या हत्या केल्या जात आहे असा आरोप करून सरकारव आंबेडकर यांनी हल्लाबोल केला आहे.

जेजुरीमध्ये समस्त धनगर समाज व बहुजन समाजाच्या वतीने दसरा महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याला भारिपचे राष्ट्रीय नेते डॉ. प्रकाश आंबेडकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि खासदार राजू शेट्टी एकाच व्यासपीठावर आले होते. “सत्तेत येण्यापूर्वी तत्कालीन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीसांनी बारामतीच्या मेळाव्यात म्हणाले होते की, सत्तेत आल्यास धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना त्यांच्याच आश्वासनाचा विसर पडला आहे. आरक्षणाचे घोंगडे फडणवीस सरकारने भिजत ठेवले आहे. राज्यातील संविधानप्रेमींनी एकाच व्यासपीठावर यायला हवे तरच परिवर्तन होईल”,असे खासदार राजू शेट्टी यावेळी बोले आहे.

दरम्यान,डॉ. प्रकाश आंबेडकर म्हणाले की,”मनुवादी विचारसरणींचे लोक बहुजनांचा विचार करूच शकत नाही. बहुजनांवर वर्चस्व टिकवण्यासाठीच दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्यासारख्या विचारवंतांच्या हत्या केल्या जात आहेत. जातीजातींमध्ये भांडणे लावली जात आहेत. याचबरोबर राज्यातील बहुजनवर्ग दुष्काळात होरपळतोय पण सरकराला मात्र दुष्काळ जाहीर करायचा नाही”.असे टीकास्त्र आंबेडकरांनी सरकारवर केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आता बिहारमध्ये शिवसेनेचे एनडीएला खुले आव्हान

News Desk

जगाच्या कानाकोपऱ्यातील मराठी माणूस हा बाळासाहेब ठाकरेंचा आजन्म ऋणी! – संजय राऊत

Aprna

नवाब मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ; वैद्यकीय तपासणीला परवानगी

Aprna
Uncategorized

आता घाटी रुग्णालयात तीन बालकांचा मृत्यू

News Desk

औरंगाबाद-येथील घाटी रुग्णलायतील प्रसूती विभागात रविवारी रात्री तीन बालकांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी नातेवाईकांना गोरखपूर घटनेची आठवण झाली. मृत बेगमपुरा स्मशानभूमीत सोमवारी सकाळी सहा वाजता एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. ही विदारक घटना पाहून रोज सरणाची व्यवस्था करणाऱ्या स्मशानजोगीच्याही डोळ्यात पाणी आले.

रविवारी मृत्युमुखी पडलेल्या तीन बालकांत दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. माया मुकेश मगरे (३०, रा. ब्रिजवाडी), पूजा पांडुरंग बखले (रा. डोंगरगाव, ता. अंबड), अर्चना विनायक मुंढे (३०, रा. धावणी मोहल्ला) अशी मृत्युमुखी पडलेल्या नवजात शिशूंच्या आईची नावे आहेत. विनायक मुंढे (३६) त्याची पत्नी अर्चना हिला रविवारी सातच्या सुमारास अचानक कळा येऊ लागल्या. त्याने तिला तत्काळ घाटीतील प्रसूती विभागात दाखल केले. सात वाजून ४० मिनिटांनी अर्चना प्रसूत झाली. मात्र मुलगा झाला आहे की मुलगी हे त्याला कोणीच सांगितले नाही. पुरुषांना प्रसूती विभागात प्रवेश नसल्यामुळे त्याला बाहेरच थांबावे लागले. अखेर सकाळी सहा वाजता विनायकच्या हातात मृत बाळ ठेवण्यात आले. माझ्या बाळाचा मृत्यू कशामुळे झाला? असे तो घाटीतील कर्मचाऱ्यांना विचारत होता. मात्र, त्याला उत्तर मिळाले नाही. काही मुले जन्मल्यानंतर केवळ पंधार मिनिटे जगतात, असे डॉक्टरांनी सांगितले.

Related posts

दंगल किंवा युद्ध करून भाजपचा निवडणुका जिंकण्याचा डाव- राज ठाकरे यांची टीका

News Desk

Aprna

Chetan Kirdat