HW News Marathi
राजकारण

अयोध्या राम मंदिराबाबत ११ डिसेंबरनंतर ठोस निर्णय होईल !

अयोध्या | अयोध्या राम मंदिरासाठी होत असलेल्या विलंबाबाबत विश्व हिंदू परिषदेने आज अयोध्या येथे धर्मसभेचे आयोजन केले आहे. “११ डिसेंबरनंतर अयोध्या राम मंदिराबाबत अध्यादेश किंवा ठोस निर्णय होऊ शकतो. केंद्र सरकारमधील एका वरिष्ठ मंत्र्यांची आणि माझी शुक्रवारी (२३ नोव्हेंबर) भेट झाली आहे. लवकरच अध्यादेश निघेल आणि तो अध्यादेश दोन तृतीयांश बहुमताने पास होईल”, असे त्या मंत्र्याने आपल्याला सांगितल्याचा दावा या परिषदेदरम्यान स्वामी भद्राचार्यजी महाराज यांनी केला आहे.

वरिष्ठ मंत्र्यांसोबत शुक्रवारी (२३ नोव्हेंबर) राम मंदिराच्या मुद्यावर जवळपास १० मिनिटे चर्चा झाल्याचे स्वामी भद्राचार्यजी महाराज यांनी सांगितले. “राम मंदिर प्रकरणाबाबत केंद्राला ६ डिसेंबरला काहीतरी करायचे होते, मात्र आचारसंहितेमुळे ते करता येणे शक्य नाही. पंतप्रधान मोदी आमचा विश्वासघात करणार नाहीत”, असा विश्वास देखील स्वामी भद्राचार्यजी महाराज यांनी व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Lok Sabha Elections 2019 LIVE UPDATE : महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्याचे मतदान

News Desk

ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्याचा निर्णयाकडे सर्वांचे लक्ष; ठाकरे गटाकडून अन्य पर्यायचा शोध सुरू

Aprna

भाजप कडून बलात्का-यांची पाठराखण | राज ठाकरे

News Desk
राजकारण

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’ची हाफ सेंच्युरी

News Desk

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात‘ कार्यक्रमाचे आज(२५ नोव्हेंबर)ला ५० भाग पूर्ण झाले आहे. याबद्दल नरेंद्र मोदी यांनी नागरिकांशी आपल्या भावना व्‍यक्‍त केल्या. मन की बातमध्ये आवाज फक्‍त माझा आहे, परंतु भावना तुमच्या असल्याचे त्यांनी सांगितले. पन्‍नास भागपुर्ण झाल्याबद्दल मनकी बातच्या जुन्या अठवणी जागवील्या आहे. तसेच मोदी यावेळी संविधान दिवस आणि गुरुनानक जयंती याबाबतही ते या कार्यक्रमात बोलत होते.

मन की बात हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून अनेक लोक हा कार्यक्रम आवडीने ऐकतात लागली. यामुळे लोकांचा कल हा पुन्हा एका आकाशवाणीकडे ओढा गेला आहे. हा कार्यक्रम विविध प्रादेशिक भाषेत प्रसारित करणार्‍या अनेक कर्मचार्‍यांचे मोदींनी अभिनंदन केले आहे. ते जेव्‍हा ३२ मिनिटे कार्यक्रम सादर करतात, तेव्‍हा त्यांनी मोदी यांची भूमिका साकारलेली असते. यामुळे आकाशवाणीच्या सर्व कर्मचार्‍यांचे मी मनापासून आभार मानत असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिवसाबद्दल माहिती सांगून देशातील तज्ञ लोकांनी संविधान निर्मितीसाठी प्रयत्‍न केला असल्याचे सांगून संविधानाबद्दल त्यांनी आदर व्‍यक्‍त केला.

Related posts

केसीआर घेणार ममता बॅनर्जी यांची भेट

News Desk

‘घड्याळ’ असलेल्या अनेक हातांनी मला मदत केली | सुरेश धस

News Desk

दानवे-खोतकरांच्या वादात मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी

News Desk