HW News Marathi
राजकारण

अयोध्या राम मंदिराबाबत ११ डिसेंबरनंतर ठोस निर्णय होईल !

अयोध्या | अयोध्या राम मंदिरासाठी होत असलेल्या विलंबाबाबत विश्व हिंदू परिषदेने आज अयोध्या येथे धर्मसभेचे आयोजन केले आहे. “११ डिसेंबरनंतर अयोध्या राम मंदिराबाबत अध्यादेश किंवा ठोस निर्णय होऊ शकतो. केंद्र सरकारमधील एका वरिष्ठ मंत्र्यांची आणि माझी शुक्रवारी (२३ नोव्हेंबर) भेट झाली आहे. लवकरच अध्यादेश निघेल आणि तो अध्यादेश दोन तृतीयांश बहुमताने पास होईल”, असे त्या मंत्र्याने आपल्याला सांगितल्याचा दावा या परिषदेदरम्यान स्वामी भद्राचार्यजी महाराज यांनी केला आहे.

वरिष्ठ मंत्र्यांसोबत शुक्रवारी (२३ नोव्हेंबर) राम मंदिराच्या मुद्यावर जवळपास १० मिनिटे चर्चा झाल्याचे स्वामी भद्राचार्यजी महाराज यांनी सांगितले. “राम मंदिर प्रकरणाबाबत केंद्राला ६ डिसेंबरला काहीतरी करायचे होते, मात्र आचारसंहितेमुळे ते करता येणे शक्य नाही. पंतप्रधान मोदी आमचा विश्वासघात करणार नाहीत”, असा विश्वास देखील स्वामी भद्राचार्यजी महाराज यांनी व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#LokSabhaElections2019 : मला फक्त समुद्राची लाट माहित आहे !

News Desk

दलितांवर खुनी हल्ला करणाऱ्यांना फाशीची शिक्षा करा

News Desk

जळगावमध्ये मतदानाला सुरुवात

News Desk