HW News Marathi
राजकारण

बांगलादेशी नामशुद्र दलितांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेणार !

मुंबई | सन 1971 पूर्वी जे बांगलादेशी भारतात आले त्यांना भारताचे नागरिकत्व मिळाले. मात्र त्यानंतर आलेल्यांना बांग्लादेशींना मतदानाचा अधिकार मिळाला असला तरी भारतीय नागरिकत्व मिळालेले नाही. याबाबत भारत सरकार ने सन 2003 साली केलेल्या कायद्यात दुरुस्ती करून जे बांगलादेशी भारतात मागील 30 वर्षांपासून राहत आहेत त्यांना भारतीय नागरिकत्व देण्यात यावे. पश्चिम बंगाल मध्ये बांगलादेशातून आलेल्या नामशुद्र या हिंदू दलितांना मतदानाचा अधिकार आहे मात्र भारताचे नागरीकत्व नाही. जे नामशुद्र दलित मागील 30 वर्षांपासून भारतात राहतात . भारतालाच आपला देश मानतात. त्यांचा बांगलादेशशी काही संबंध राहिला नाही. ज्यांची भारत देशाशी प्रमाणिक राहून या देशात राहण्याची ईच्छा आहे अश्या नामशुद्र समाजातील बांग्लादेशींना भारताचे नागरिकत्व मिळाले पाहिजे या मागणीसाठी आपण लवकरच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

पश्चिम बंगाल मधील नॉर्थ 24 परगणा येथील हरिषपूर मध्ये मधुवा महासंघाच्या वतिने आयोजित मधुवा समाजाच्या भव्य मेळाव्यात ना रामदास आठवले बोलत होते. यावेळी मधुवा महासंघाचे अध्यक्ष शंतनू ठाकूर ; रिपाइं चे पश्चिम बंगाल चे प्रदेशाध्यक्ष मृत्युंजय मलिक आदी मान्यवर उपस्थित होते. भारतातून अन्य देशांत गेलेल्या लोकांना त्या त्या देशात नागरिकत्व मिळते. तसेच अन्य देशातून आलेल्यांना भारत देशावर प्रेम करून भारताशी प्रामाणिक राहून भारतालाच आपला देश मानून भारतात राहायचे असेल तर त्यांना भारतीय नागरिकत्व काही अटींची पूर्तता करून द्यायला पाहिजे.त्याप्रमाणे बांग्लादेधी नामशुद्रांना भारतीय नागरिकत्व दिले पाहिजे अशी भूमीका रामदास आठवलेंनी यावेळी जाहीर केली.

बांगलादेशातून भारतात आलेल्या नामशुद्र समाजाला भारताचे नागरीकत्व मिळावे यासाठी आपण युपीए सरकार च्या काळात तत्कालीन प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांची भेट घेतली होती. तसेच त्यांनंतर आता भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांचीही भेट घेऊन मागणी केली होती. त्यानुसार बांग्लादेशींना भारतीय नागरिकत्व देण्याबाबत चा सन 2003 च्या कायद्यात दुरुस्ती करण्याचा अधिकार सरकारला आहे. त्यामुळे बांगलादेशी नामशुद्र समाजाला भारताचे नागरिकत्व देण्यात यावे मागणीसाठी आपण लवकरच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे रामदास आठवले यावेळी म्हणाले.

पश्चिम बंगाल मध्ये अनेक मतदारसंघात नामशूद्रांचे प्राबल्य आहे. त्यांच्या मतदानाच्या बळावर मुख्यमंत्री झालेल्या ममता बॅनर्जी यांनाही नामशुद्र समाजाला भारतीय नागरिकत्व देण्यासाठी केंद्रसरकारकडे प्रस्ताव पाठवावा असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले. या मेळाव्यास नामशुद्र ( मधुवा ) समाजाच्या लोकांना मेळाव्यास मोठी गर्दी केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर केले सरकार स्थापन”, मुख्यमंत्र्यांचे विधान

Aprna

मुख्यमंत्र्यांना दादाची ट्यूशन लावावी लागेल- राष्ट्रवादी कॉँग्रेसचा मुख्यमंत्र्यावर हल्ला

swarit

मुजफ्फरपूरमध्ये राज ठाकरेंविरोधात याचिका दाखल

News Desk