HW News Marathi
राजकारण

कृषी क्षेत्रातला विकास पाहायला बारामतीला या

बारामती | देशाचा विकास होण्यासाठी कृषी क्षेत्राचा विकास होणे गरजेचे आहे. कृषी क्षेत्रासह ग्रामीण विकास पाहायचा असेल तर संसदेतील प्रत्येक खासदाराने बारामतीला भेट द्यायला हवी, असे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. सध्या नायडू हे बारामतीच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. विद्या प्रतिष्ठानमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. याप्रसंगी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आदी मंडळी यावेळी उपस्थित होती.

ग्रामीण विकासाचे जे चित्र मी पाहिले होते, तसेच हुबेहुम चित्रे मला येथे पाहायला मिळाले. बारामती दौऱ्यामुळे मला प्रचंड आनंद झाला असल्याचे उपराष्ट्रपती यांनी म्हटले होते. अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित कृषी विज्ञान केंद्राचेही नायडू यांनी याचे कौतुक केले आहे. तसेच शेती क्षेत्रात काही समस्या आहेत. परंतु समस्यांचे समाधान आपण शोधले पाहिजे, असे देखील यावेळी व्यंकय्या नायडू यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्य प्रदेशमध्ये भाजप नेत्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

News Desk

नाशिकच्या हिरे कुटुंबियांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

News Desk

महानुभाव संमेलनात एकनाथ खडसे एकटे; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna