HW News Marathi
राजकारण

केंद्राच्या आशीर्वादानेच विमा कंपन्या श्रीमंत झाल्या, काँग्रेसचा गंभीर आरोप

मुंबई | केंद्र सरकारच्या आशीर्वादानेच शेतकऱ्यांना छळून विमा कंपन्या श्रीमंत झाल्या आहेत असा गंभीर आरोप प्रदेश काँग्रेस सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. पंतप्रधान पीकविमा योजना म्हणजे शेतकरी लूट योजना बनली आहे, अशी देखील टीका सचिन सावंत यांनी केली आहे.

पंतप्रधान पीकविमा योजनेत विमा कंपन्यानी अनावश्यक चुका काढत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाकारली असल्याचे स्टेट बँक आॅफ इंडियाच्या पत्रातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, बँकांनी याची माहिती केंद्र सरकारला द्यावी, असे सांगत राज्य सरकारने मात्र आपली जबाबदारी झटकली आहे. विमा कंपन्यांवर कारवाई करण्यापेक्षा नुकसान भरपाईच्या दाव्यांवर पुन्हा विचार करावा, असा सल्ला देखील राज्य सरकारने दिल्याचे सचिन सावंत यांनी सांगितले आहे.

दरम्यान, राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार, २०१६-१७ या वर्षात साधारणतः १ कोटी १८ लाख शेतकऱ्यांनी ४०१०.६६ कोटी रुपये पीक विम्याचे हप्ते भरले होते. मात्र त्यांना नुकसान भरपाई ही केवळ १९९७ कोटी रुपयेच दिली गेली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकसभेसाठी सेना-भाजपची युती होणार ?

News Desk

उपमुख्यमंत्र्यांचा अचानक दिल्ली दौरा; मंत्रिमंडळसंदर्भात पक्षश्रेष्ठींची करणार चर्चा?

Aprna

भगवान हनुमान हे दलित नाही, ते तर आदिवासी होते !

News Desk