HW News Marathi
राजकारण

केंद्राच्या आशीर्वादानेच विमा कंपन्या श्रीमंत झाल्या, काँग्रेसचा गंभीर आरोप

मुंबई | केंद्र सरकारच्या आशीर्वादानेच शेतकऱ्यांना छळून विमा कंपन्या श्रीमंत झाल्या आहेत असा गंभीर आरोप प्रदेश काँग्रेस सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. पंतप्रधान पीकविमा योजना म्हणजे शेतकरी लूट योजना बनली आहे, अशी देखील टीका सचिन सावंत यांनी केली आहे.

पंतप्रधान पीकविमा योजनेत विमा कंपन्यानी अनावश्यक चुका काढत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाकारली असल्याचे स्टेट बँक आॅफ इंडियाच्या पत्रातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, बँकांनी याची माहिती केंद्र सरकारला द्यावी, असे सांगत राज्य सरकारने मात्र आपली जबाबदारी झटकली आहे. विमा कंपन्यांवर कारवाई करण्यापेक्षा नुकसान भरपाईच्या दाव्यांवर पुन्हा विचार करावा, असा सल्ला देखील राज्य सरकारने दिल्याचे सचिन सावंत यांनी सांगितले आहे.

दरम्यान, राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार, २०१६-१७ या वर्षात साधारणतः १ कोटी १८ लाख शेतकऱ्यांनी ४०१०.६६ कोटी रुपये पीक विम्याचे हप्ते भरले होते. मात्र त्यांना नुकसान भरपाई ही केवळ १९९७ कोटी रुपयेच दिली गेली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“काहींची भाषणे फारच लांबली होती, नको इतकी लांबली…”, अजित पवारांचा शिंदेंना टोला

Aprna

राहुल गांधींनी फोनवरून संजय राऊतांच्या तब्येतीची केली विचारपूस

Aprna

 नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी | कमल हसन

News Desk
राजकारण

खरा धक्का तर निकालाच्या दिवशी असतो

News Desk

मुंबई | खरा धक्का तर निकालाच्या दिवशी असतो असे वक्तव्य विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी रमेश कराड यांनी घेतलेल्या माघारी संदर्भात प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. त्याच बरोबर हि निवडणूक आमच्यासाठी प्रतिष्ठेची आहे आम्ही ती जिंकूच असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने अशोक जगदाळे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

या संदर्भात सोमवारी विधानभवनात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मुंडे म्हणाले, रमेश कराडांना आम्ही पक्षात घेऊन असे काय झाले की त्यांनी माघार घेतली ? या प्रश्नाचे उत्तर फक्त तेच देऊ शकतील. सध्या आमच्या दृष्टीने निवडणूक जिंकणे महत्वाचे आहे. ती आम्ही जिंकूच परंतु या संदर्भात मी तुर्तास काही बोलणार नाही खरा धक्का निकालाच्या दिवशी लागेल असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

Related posts

पंतप्रधान मोदींनी मतदानाच्या दिवशी केलेल्या ‘रोड शो’चा अहवाल आयोगाने मागविला

News Desk

रामराजे नाईक निंबाळकर शिवसेनेच्या वाटेवर

News Desk

डॉ. आंबेडकरांचा पुतळा संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयात उभारणार !

News Desk