HW News Marathi
राजकारण

केंद्राच्या आशीर्वादानेच विमा कंपन्या श्रीमंत झाल्या, काँग्रेसचा गंभीर आरोप

मुंबई | केंद्र सरकारच्या आशीर्वादानेच शेतकऱ्यांना छळून विमा कंपन्या श्रीमंत झाल्या आहेत असा गंभीर आरोप प्रदेश काँग्रेस सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. पंतप्रधान पीकविमा योजना म्हणजे शेतकरी लूट योजना बनली आहे, अशी देखील टीका सचिन सावंत यांनी केली आहे.

पंतप्रधान पीकविमा योजनेत विमा कंपन्यानी अनावश्यक चुका काढत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाकारली असल्याचे स्टेट बँक आॅफ इंडियाच्या पत्रातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, बँकांनी याची माहिती केंद्र सरकारला द्यावी, असे सांगत राज्य सरकारने मात्र आपली जबाबदारी झटकली आहे. विमा कंपन्यांवर कारवाई करण्यापेक्षा नुकसान भरपाईच्या दाव्यांवर पुन्हा विचार करावा, असा सल्ला देखील राज्य सरकारने दिल्याचे सचिन सावंत यांनी सांगितले आहे.

दरम्यान, राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार, २०१६-१७ या वर्षात साधारणतः १ कोटी १८ लाख शेतकऱ्यांनी ४०१०.६६ कोटी रुपये पीक विम्याचे हप्ते भरले होते. मात्र त्यांना नुकसान भरपाई ही केवळ १९९७ कोटी रुपयेच दिली गेली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

२०१९च्या निवडणुकीत ‘कर्नाटकी कशिद्या’ची छाप दिसेल काय?

News Desk

KarnatakaByElection2018 : कर्नाटकात भाजपचा दारूण पराभव

News Desk

शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी तारीख निश्चित ?

News Desk
राजकारण

राम मंदिरासाठी हिंदू संतांचा सरकारवर दबाव

swarit

नवी दिल्ली । आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी सरकारने ठोस पावले उचलावीत असा दबाव वारंवार सरकारवर होत आहे. बाबरी मशिद-राम मंदिराच्या वादावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालायने लांबणीवर टाकली आहे. ‘आता संयम संपत चालला आहे, गरज पडली तर राम मंदिरासाठी पुन्हा १९९२ प्रमाणे आंदोलन सुरु करावे लागेल’ असे विधान राष्ट्रीय स्वयंम संघाने केले आहे. त्यांनतर आता हिंदू संतांनी सुद्धा सरकारवर दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे.

तालकटोरा स्टेडियममध्ये गेले दोन दिवस अखिल भारतीय संत समितीचे अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाला देशभरातून आलेल्या तीन हजारांहून अधिक संतांनी उपस्थिती दर्शवली होती. अयोध्येतील राम मंदिराखेरीज गोरक्षा व गंगा शुद्धिकरणाची एकमुखाने मागणी केली आहे. येत्या ६ डिसेंबरपूर्वी केंद्र सरकारनेयासाठी निर्णायक पाऊल उचलावे, अशी मागणी तिथे कऱण्यात आली आहे.अधिवेशनाचा समारोप करताना समितीचे निमंत्रक रामानंद हंसदेवाचार्य यांनी केंद्र सरकारला आदेश दिला,

“केंद्र सरकारने राम मंदिरासाठी येत्या अधिवेशनात कायदा करावा किंवा वटहुकूम काढावा”. “सध्याच्या केंद्र सरकारचे काम समाधानकारक असले,तरी आगामी निवडणुकीत ‘गाय’ ‘गंगा’ व ‘गोविंद’ यांचे रक्षण करणाऱ्यांनाच जनतेने निवडून द्यावे”, असे आवाहन ही संतांनी केले आहे.अधिवेशनात भाषण करताना जगद्गुरू रामभद्राचार्य म्हणाले की, आपलीच माणसे सत्तेवर बसवूनही ते इतरांसारखे वागतात हे पाहून धक्का बसला. अयोध्येत राम मंदिर उभे राहायलाच हवे.

 

Related posts

मोदी सरकारच्या आधारसक्तीचा ‘परीघ’ कमी झाला | ठाकरे

News Desk

मनसेची दुसरी उमेदवार यादी जाहीर, आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार नाही

News Desk

काँग्रेसमध्ये पंतप्रधानपदाची जागा ही जन्मापासूनच आरक्षित !

News Desk