HW News Marathi
राजकारण

उपोषण मागे, मराठा समाजाचा आंदोलन सुरूच

मुंबई | सकल मराठा क्रांती महामोर्चाने गेल्या १६ दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण अखेर मागे घेतले आहे. मराठा आरक्षणासाठी हे आमरण उपोषण सुरू केले होते. सरकार आरक्षण देणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा मराठा समाजाच्यावतीने दिला होता. परंतु रविवारी सकाळी मराठा समाजाकडून आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हे आमरण उपोषण मागे असल्याची माहिती प्रा. संभाजी पाटील यांनी दिली आहे.

आता आंदोलन करू नका, १ डिसेंबरला जल्लोष करा’ असे विधान करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत आश्वासन दिले होते. यानंतर देखील सकल मराठा क्रांती महामोर्चाने आमरण उपोषण मागे घेतले नाही. मुख्यमंत्र्यांच्यावतीने जलसंपदा मंत्री गिरीश महाजय यांनी उपोषणाला बसलेल्यांची भेट घेऊ विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेनाच्या पहिल्याच दिवशी मराठा आरक्षणाबाबत दोन्ही सभागृहांची मंजुरी घेऊन त्याचे कायद्यात रुपांतर करून घेण्यासाठी सरकारला भाग पाडावे. तसेच आमरण उपोषण मागे घेण्यात आले असले तरी आरक्षणाची घोषणा होईपर्यंत आणि इतर मागण्यांची पूर्तता होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी घोषणाही पाटील यांनी पत्रकार परिषेदत केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

काँग्रेसने चॅकलेट चेहरा राजकारणात आणला !

News Desk

रामाचा पुतळा उभारण्यापेक्षा मंदिर बांधण्यावर भर द्या, धर्मगुरुंचा योगींना सल्ला

News Desk

माफीय संजय राऊतला आता हिशोब द्यावा लागणार! – किरीट सोमय्या

Aprna
राजकारण

‘ठग ऑफ महाराष्ट्र’ पोस्टरमधून विरोधकांकडून सरकारवर टीका

News Desk

मुंबई | ‘ठग ऑफ महाराष्ट्र’ आणि ‘ठगबाजीची चार वर्षे’ या पोस्टरद्वारे विरोधकांची सरकारवर टीका केली आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशानपूर्वी बैठकीनंतर होणाऱ्या पत्रकार परिषदेसाठी लावण्यात आलेले पोस्टर सर्वांचे लक्ष वेधी ठरले आहे. या पोस्टरमध्ये ठग्स ऑफ हिंदुस्थानच्या पार्श्वभुमीवर विरोधाकांनी ठग ऑफ महाराष्ट्र असे नाव देऊन हे पोस्टर लावले आहे. ठग्स ऑफ हिंदुस्तान या सिनेमात आमीर खानच्या जागी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिताभ बच्चन यांच्या जागी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले आहेत.या पोस्टरमधून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर बोचरी टीका केली आहे.

तसेच सरकारने गेल्या चार वर्षांत केलेल्या ठगबाजीचा पाढाच वाचण्यात आला आहे. त्यामध्ये जनतेशी ठगबाजी, औद्योगिक ठगबाजी, भावनिक ठगबाजी, ग्राहकांशी ठगबाजी, शेतकऱ्यांशी ठगबाजी आणि बेरोजगारांशी ठगबाजी, अशे विविध उदाहरणे देऊन सरकारचे अपयश सांगण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी सुरू असलेल्या विरोधी पक्षाच्या गटनेत्यांच्या बैठकीला विखे पाटील, धनंजय मुंडे, पृथ्वीराज चव्हाण, अजितदादा पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गणपतराव देशमुख, शेकापचे जयंत पाटील, अबू आसिम आझमी, बसवराज पाटील, हेमंत टकले, जिवा पांडू गावीत, कपिल पाटील, भाई जगताप, जितेंद्र आव्हाड, विद्याताई चव्हाण आदी नेते उपस्थित आहेत.

Related posts

पार्थ प्रकरणी अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

swarit

जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात २ दहशतवाद्यांचा खात्मा

News Desk

मराठा समाजाचे आजपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण

Gauri Tilekar