HW News Marathi
राजकारण

उपोषण मागे, मराठा समाजाचा आंदोलन सुरूच

मुंबई | सकल मराठा क्रांती महामोर्चाने गेल्या १६ दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण अखेर मागे घेतले आहे. मराठा आरक्षणासाठी हे आमरण उपोषण सुरू केले होते. सरकार आरक्षण देणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा मराठा समाजाच्यावतीने दिला होता. परंतु रविवारी सकाळी मराठा समाजाकडून आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हे आमरण उपोषण मागे असल्याची माहिती प्रा. संभाजी पाटील यांनी दिली आहे.

आता आंदोलन करू नका, १ डिसेंबरला जल्लोष करा’ असे विधान करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत आश्वासन दिले होते. यानंतर देखील सकल मराठा क्रांती महामोर्चाने आमरण उपोषण मागे घेतले नाही. मुख्यमंत्र्यांच्यावतीने जलसंपदा मंत्री गिरीश महाजय यांनी उपोषणाला बसलेल्यांची भेट घेऊ विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेनाच्या पहिल्याच दिवशी मराठा आरक्षणाबाबत दोन्ही सभागृहांची मंजुरी घेऊन त्याचे कायद्यात रुपांतर करून घेण्यासाठी सरकारला भाग पाडावे. तसेच आमरण उपोषण मागे घेण्यात आले असले तरी आरक्षणाची घोषणा होईपर्यंत आणि इतर मागण्यांची पूर्तता होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी घोषणाही पाटील यांनी पत्रकार परिषेदत केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी निवडणूक जिंकणारच आहे, तुमच्याशिवाय किंवा तुमच्यासोबत !

News Desk

महाराष्‍ट्र विधानपरिषदेवर निर्वाचित झालेल्या सदस्यांना शपथ

Aprna

आता डान्सबारमध्ये प्रवेश करण्यासाठी ओळखपत्र बंधनकारक ?

News Desk