HW News Marathi
राजकारण

भाजप आणि राष्ट्रवादीला आणखी एक धक्का

मुंबई | ऐन निवडणूकीच्या तोंडावर भाजप आणि राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसला आहे. भाजपचे नेते व एन्काउंटर फेम माजी पोलीस अधिकारी रवींद्र आंग्रे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस मुनाफ हकीम यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. रविंद्र आंग्रे हे भाजपचे नेते आणि मोठे सनदी अधिकारी होते. तर मुनाफ हकीम हे राष्ट्रवादीचे नेते होते. मात्र त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसची ताकद वाढली आहे भाजप आणि राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जातोय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

…तर राज्यात नवी समीकरणे निर्माण होऊ शकतात !

News Desk

नाशिक पदवीधर निवडणुकीच्या दृष्टीने ‘मविआ’ निर्णय घेणार?

Aprna

अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश

News Desk
राजकारण

धुळ्याचे भाजप आमदार अनिल गोटेंनी स्थापन केला नवा पक्ष

News Desk

धुळे | धुळे शहरातील भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी आपण भाजप पासुन वेगळे होत असल्याची घोषणा केली आहे. येणारी महानगर पालीका निवडणूक ‘स्वाभिमानी भाजप = लोकसंग्राम’ पक्षाकडून लढविली जाईल असे त्यांनी सांगितले. गोटे यांच्या या नव्या पक्षाकडून त्यांच्या पत्नी हेमा गोटे ह्या महापौरपदाच्या उमेदवार असतील असे त्यांनी सांगीतले. भाजपाने अनिल गोटे यांना धुळ्यातल्या महापालिका निवडणुकांमधून डावलल्यामुळे नाराज झालेल्या अनिल गोटेंनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली.

भाजपाने आपली फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ९ डिसेंबरला धुळे महापालिकेची निवडणूक होणार आहे. धुळे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनिल गोटे आणि भाजपा नेते व मंत्री सुभाष भामरे यांच्यात वाद सुरु आहे. त्यामुळेच गोटे यांनी राजीनामाही दिला होता. मात्र पक्षांमध्ये गुन्हेगारांना प्रवेश द्यायचा नाही आणि धुळे महापालिका निवडणूक आपल्या नेतृत्त्वाखाली लढली जावी या दोन अटींवर आपण राजीनामा मागे घेतल्याचे त्यांनी म्हटले होते.

गोटे म्हणाले, आज माझ्या समर्थकांनी एक बैठक घेऊन 9 डिसेंबर रोजी होणा-या आगामी महानगरपालिका निवडणुकीत सर्व 74 जागी स्वतंत्र उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला. आमच्या या पक्षाचे नाव ‘स्वाभिमानी भाजप = लोकसंग्राम’ असे राहील व याच पक्षाच्या नावावर आम्ही निवडणूक लढविणार आहोत. निवडणूक अधिका-यांनी आमच्या नव्या पक्षाला शिट्टी हे चिन्ह दिले आहे असेही गोटे यांनी सांगितले.

भाजपचे केवळ सत्तेसाठी होत असलेले अध:पतन मन अस्वस्थ करणारे आहे. मतांची संख्या वाढ करण्याकरिता आम्ही गुंडांना प्रवेश देतो, असे दानवे सांगतात. गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरुद्ध संघर्ष यात्रा काढली होती. आज ते हयात असते, तर तुम्ही असे धाडस केले असते का, असा प्रश्नही आमदार अनिल गोटे यांनी राजीनामा देताना उपस्थित केला होता.

Related posts

“सात पानापैकी चार पाने हे आम्ही यापूर्वी दिलेल्या पत्रातीलच”, देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना टोला

Aprna

मी माझ्या घरातील मुलांचे बालहट्ट पुरवणार, दुसऱ्यांचे कशाला!

News Desk

जयंत पाटील यांच्या स्वागताला हजारो कार्यकर्ते रस्त्यावर! नियम तोडले म्हणून मंत्र्यांवर गुन्हे दाखल करणार का?

News Desk