HW News Marathi
राजकारण

…तर राज्यात नवी समीकरणे निर्माण होऊ शकतात !

मुंबई | “शिवसेनेने जर भूमिका घेतली तर महाराष्ट्रामध्ये नवी समीकरणे निर्माण होऊ शकतात”, असे सूचक विधान राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले आहे. आज (४ नोव्हेंबर) मुंबईत पत्रकारांशी बोलताना नवाब मलिक यांनी राज्यातील सत्तास्थापनेच्या मुद्द्यावरून भूमिका स्पष्ट केली आहे. “शिवसेनेला असं वाटतंय कि आता आमच्या हातामध्ये राज्याच्या सत्तेची किल्ली आहे. म्हणूनच शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी दावा करत आहे. जर शिवसेनेने ठरवले कि मुख्यमंत्री त्यांचाच हवा तर ते शक्य होऊ शकते. जर शिवसेनेने भाजपशी नातं तोडलं तर याबाबतीत विचार होऊ शकतो”, असे स्पष्ट विधान यावेळी नवाब मलिक यांनी यावेळी केले आहे. दरम्यान, नवाब मलिक यांच्या या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

राज्यातील सत्तास्थापनेच्या मुद्द्यावरून सध्या महायुतीचे दोन्ही मोठे पक्ष असलेल्या शिवसेना-भाजपमध्ये मोठा संघर्ष सुरु आहे. राज्यातील जनतेने कौल दिलेला असूनही मुख्यमंत्रीपद आणि जागावाटपाच्या फॉर्म्युल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना-भाजपमध्ये सध्या मोठा संघर्ष सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर, राज्यात सन्मानजनक कौल मिळालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना असेही नवे समीकरण पाहायला मिळू शकते अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगत आहे. या चर्चांना आता नवाब मलिक यांनी देखील दुजोरा दिला आहे. “शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केली आणि भाजपशी नाते तोडले तर राज्यात नवी समीकरणे पाहायला मिळू शकतात. याबाबतीत विचार होऊ शकतो”, असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

नेमके काय म्हणाले नवाब मलिक ?

  • महाराष्ट्रामध्ये सत्तास्थापनेसाठी जनतेचा कौल भाजप-शिवसेना महायुतीला मिळालेला आहे. मात्र, गेल्या १२ दिवसांमध्ये महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी कोणत्याही हालचाली सुरु झालेल्या नाहीत.
  • भाजपची ही जबाबदारी होती कि राज्यपालांकडे जाऊन त्यांनी सत्तास्थापनेचा दावा केला पाहिजे. मात्र, ते तसं करत नाहीत.

    भाजपकडून शिवसेनेला याआधीची ५ वर्षे ज्या पद्धतीने वागणूक देण्यात आली. त्यामुळे शिवसेनेला असं वाटतंय कि आता आमच्या हातामध्ये सत्तेची किल्ली आहे. म्हणूनच शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी दावा करत आहे.

  • जर शिवसेनेने ठरवले कि मुख्यमंत्री आपलाच हवा तर ते शक्य होऊ शकते. जर शिवसेनेने भाजपशी नातं तोडलं तर याबाबतीत विचार होऊ शकतो.
  • राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या या ज्या काही धमक्या देण्यात येत आहेत तो राज्यातील जनतेने दिलेल्या कौलाचा अपमान करण्याचा प्रकार आहे.
  • भाजपने लवकरात लवकर सत्ता स्थापन केली पाहिजे.
  • नाहीतर जर राष्ट्रपती राजवट लागू होण्याची वेळ आली तर आम्ही पर्यायाबाबत विचार करू. पटलावर सरकार पडलं तरीही आम्ही पर्यायाबाबत विचार करू.
  • शेवटी भूमिका ही शिवसेनेला घ्यायची आहे.
  • शिवसेनेने जर भूमिका घेतली तर महाराष्ट्रामध्ये नवी समीकरणे निर्माण होऊ शकतात
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“संसदेच्या पावसाळी अधिवेशनात खुल्या मनाने संवाद साधायला हवा,” पंतप्रधानांचे खासदारांना आवाहन

Aprna

वायनाडमध्ये राहुल गांधी विरोधात २ ‘राहुल गांधी’ तर १ ‘गांधी’ निवडणुकीच्या रिंगणात

News Desk

ठाकरे गटाला धक्का! माजी आमदार अवधूत तटकरे आणि मीरा भाईंदरचे तीन नगरसेवक भाजपामध्ये सामील

Aprna