HW News Marathi
राजकारण

पुण्यात सर्व जागांवर भाजपचा दावा, मग शिवसैनिकांनी फक्त झेंडेच उचलायचे का ?

पुणे | आगामी विधानसभेच्या दृष्टीने शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपाबाबत अद्याप चर्चा सुरूच आहे. दरम्यान, काही मतदारसंघांमध्ये मात्र शिवसेना-भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर मतभेद असल्याचे दिसून येत आहे. “आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पुण्याच्या 8 ही जागांवर भाजपकडून दावा करण्यात आला आहे. मग आता शिवसैनिकांनी फक्त झेंडेच उचलायचे का ?”, असा संतप्त सवाल शिवसेना नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे. “पुण्यातील विधानसभा जागांवरुन भाजप-शिवसेनेत वाद होण्याची चिन्हे आहेत”, असेही शिवाजीराव आढळराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

“भोसरी मतदारसंघातून शिवसेनेचाच खासदार आणि आमदार निवडून आला आहे. त्यामुळे आगामी विधानसभेतही युती असल्यास भोसरीची जागा शिवसेनेलाच मिळायला हवी”, असे म्हणत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भोसरीच्या जागेवर दावा सांगितला आहे. “भोसरी विधानसभा मतदारसंघ पहिल्यापासूनच शिवसेनेकडे राहिला आहे. २००९ सालच्या विधानसभेत भाजप-शिवसेनेची युती असताना हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आला होता. तर २०१४ साली शिवसेनेच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यामुळे जर भाजपकडून या जागांवर दावा सांगण्यात येत असेल तर भाजप-शिवसेनेत वाद होण्याची चिन्हे आहेत”, असे शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकसभेचा प्रचार संपला, ‘नमो टीव्ही’ देखील बंद

News Desk

काँग्रेस-राष्ट्रवादीने १५ वर्षे महाराष्ट्राचे मोठे नुकसान केले !

News Desk

सवर्णांना आरक्षण दिले, आता नोकऱ्या द्या !

News Desk