HW News Marathi
राजकारण

सत्ता टिकवण्यासाठी भाजप वाटेल त्या थराला जात आहे !

पुणे | “सत्ता टिकवण्यासाठी भाजप वाटेल त्या थराला जात आहे. त्यांच्यापासून या देशाला वाचवा. स्वत:ला विष्णूचा अवतार म्हणवून घेणाऱ्या पंतप्रधानांची लाट आता संपली आहे. गेल्या साडेचार वर्षांत त्यांनी देशातील लोकांचा केवळ अपेक्षाभंग केला आहे. आपले अपयश लोकांसमोर उघडे पडू नये म्हणून भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व आणि पंतप्रधान विरोधकांवर मर्यादा सोडून टीका करून लोकांचे लक्ष भरकटविण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या जनसंपर्क अभियानाचा शुभारंभ प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. राजस्थान निवडणुकांच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अत्यंत वादग्रस्त भाषा वापरली असल्याचे महाजन यांनी यांनी म्हटले. “काँग्रेसच्या विधवेने विधवा महिलांचे अनुदान खाल्ले”, असे वक्तव्य पंतप्रधान मोदींनी या प्रचारादरम्यान केल्याचे महाजन यांनी सांगितले असून देशाच्या पंतप्रधानांनी अशी गावगुंडांनी भाषेचा बोलावी हे अत्यंत दुर्दैव असल्याचे महाजन यांनी यावेळी म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज ठाकरेंना बजावलेल्या नोटीसीवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

News Desk

शिवसेने नेते अर्जुन खोतकरांवर EDची कारवाई; सहकारी साखर कारखान्याची जमीन केली जप्त

News Desk

HW Exclusive : ईडी, सीबीआय अन् आयटी तपास यंत्रणा पंतप्रधानांच्या बंगल्याबाहेरील शेपूट हलवणार कुत्रे! – भाई जगताप

Aprna
मुंबई

भिंडेना आठ दिवसांत अटक करा, नाही तर विधान भवनाला घेरा घालू

News Desk

मुंबई | भिमा-कोरेगाव प्रकरणी मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसात अटक करा, नाही तर विधान भवनाला घेराव घालू असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला दिले आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर आझाद मैदानातील ‘एल्गार मोर्चा’त प्रकाश आंबेडकर बोलत होते.

भिमा-कोरेगाव प्रकरणाला तीन महिने पूर्ण झाले असून सुद्धा मुख्य आरोपी संभाजी भिडे अद्यापही मोकाट फिरत आहे. त्यामुळे हा एल्गार मोर्चा काढण्यात आला. सरकार संभाजी भिंडे याला जावयासारखी वागणूक का देत आहेत असा सवाल आरोप प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी उपस्थित केला. या प्रकरणातील दुसरा मुख्य आरोपी मिलिंद एकबोटे यांना पोलिसांनी अटक केले आहे.

Related posts

नगरसेवकांचे ‘प्रजा फाऊंडेशन’कडून प्रगतिपुस्तक जाहीर

News Desk

हिंदुजा महाविद्यालयाला अवैध पार्किंगचा विळखा, वाहतुक पोलिस शाखा बघ्याच्या भुमिकेत

News Desk

मुंबईत १००० मुला-मुलींसाठी वसतीगृह सुरू करण्याची मागणी

swarit