HW News Marathi
राजकारण

सत्ता टिकवण्यासाठी भाजप वाटेल त्या थराला जात आहे !

पुणे | “सत्ता टिकवण्यासाठी भाजप वाटेल त्या थराला जात आहे. त्यांच्यापासून या देशाला वाचवा. स्वत:ला विष्णूचा अवतार म्हणवून घेणाऱ्या पंतप्रधानांची लाट आता संपली आहे. गेल्या साडेचार वर्षांत त्यांनी देशातील लोकांचा केवळ अपेक्षाभंग केला आहे. आपले अपयश लोकांसमोर उघडे पडू नये म्हणून भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व आणि पंतप्रधान विरोधकांवर मर्यादा सोडून टीका करून लोकांचे लक्ष भरकटविण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या जनसंपर्क अभियानाचा शुभारंभ प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. राजस्थान निवडणुकांच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अत्यंत वादग्रस्त भाषा वापरली असल्याचे महाजन यांनी यांनी म्हटले. “काँग्रेसच्या विधवेने विधवा महिलांचे अनुदान खाल्ले”, असे वक्तव्य पंतप्रधान मोदींनी या प्रचारादरम्यान केल्याचे महाजन यांनी सांगितले असून देशाच्या पंतप्रधानांनी अशी गावगुंडांनी भाषेचा बोलावी हे अत्यंत दुर्दैव असल्याचे महाजन यांनी यावेळी म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी १४ उमेदवारांची नामनिर्देशने वैध

Aprna

अण्णासाहेब मायकर व्हायरल ऑडिओ क्लीपवर विनायक मेटेंच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया

Aprna

नितीन गडकरींना पुन्हा एकदा व्यासपीठावर आली भोवळ

News Desk