HW News Marathi
राजकारण

भाजप सरकारच्या काळात महागाईवर नियंत्रण ठेवण्यात यश आले ! 

नवी दिल्ली । “भाजप सरकारच्या कार्यकाळात योग्य आर्थिक नियोजनामुळे देशातील महागाईवर नियंत्रण ठेवण्यात यश आले आहे. त्याचप्रमाणे भ्रष्टाचारावर घाला घातल्याने देखील महागाईचे प्रमाण कमी झाले आहे. एकीकडे पाकिस्तानात महागाई प्रचंड प्रमाणात वाढलेली असताना भारतात मात्र महागाईवर नियंत्रण ठेवण्यात सरकारला यश आले आहे. महागाईला पाकिस्तानातून भारतात येता आले नाही”, असा दावा केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे.

राजनाथ सिंह हे हिमाचल प्रदेशामधील मंडी येथील प्रचारसभेत बोलत होते. “भारताचा निवडणुकीचा इतिहास पाहता तर प्रत्येक निवडणुकीत महागाईचा मुद्दा आला आहेच. काँग्रेसच्या कार्यकाळात प्रत्येक निवडणुकीत हा मुद्दा येत राहिला आहे. मात्र, २००४ आणि २०१९ च्या निवडणुकीत हा महागाईचा मुद्दा आलेला नाही. भाजप सरकारच्या आर्थिक धोरणाच्या योग्य नियोजनामुळे देशातील महागाईच्या समस्येवर नियंत्रण मिळवता आले आहे”, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे तुकडे करुन बांग्लादेश बनवला तेव्हा त्यांचे मोठे कौतुक झाले. मग आता पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले तर त्यांचे कौतुक का करु नये ? असा सवाल देखील यावेळी राजनाथ सिंह यांनी उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विरोधी पक्षांच्या एकमुखी आवाजाने ‘तोफ’ का थरथरली?

News Desk

भाजपला संविधानाला हातही लावू देणार नाही

News Desk

संजय राऊतांना 4 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

Aprna