HW News Marathi
राजकारण

भाजपने मित्रपक्षांना जागा ‘दाखवली’ म्हणजे ‘दिली’, उद्धव ठाकरेंचा टोला

मुंबई | “आम्ही जागा दिल्या. परंतु, भाजपने त्यांच्या वाट्याला आलेल्या जागांचे काय करायचे, मित्रपक्षांना कोणती ‘जागा दाखवायची’ म्हणजे मित्रपक्षांना कोणती ‘जागा द्यायची’ ? ते त्यांनी ठरवावे. “, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला लगावत मित्रपक्षांसाठी देखील सूचक विधान केले आहे. महायुतीकडून जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाल्यानंतर भाजपकडून मित्रपक्षांना देण्यात आलेल्या जागांच्या संदर्भात पत्रकाराने उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला असता त्यांना याचे सूचक उत्तर दिले आहे. बांद्र्यातील रंगशारदा सभागृहात उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (४ ऑक्टोबर) संयुक्त पत्रकार परिषदेत महायुतीची अधिकृत घोषणा करत जागावाटपाचा फॉर्म्युला देखील जाहीर केला. यावेळी, भाजप १५० जागा, शिवसेना १२४ जागा तर मित्रपक्ष १४ जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यांपैकी रासप वगळता अन्य सर्वच मित्र हे भाजपच्या आग्रही मागणीनुसार कमळाच्या चिन्हावर आगामी विधानसभा निडवणूक लढविणार आहेत. त्यातही मित्रपक्ष त्यांना मिळविलेल्या जागांवर असमाधानी असल्याचे देखील चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे यांनी भाजपसह मित्रपक्षांना टोला लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राम कदम यांची जीभ छाटणाऱ्याला पाच लाख रुपये | सुबोध सावजी

News Desk

काँग्रेसच्या नगरसेविका के. पी. केणी यांचे पद रद्द

News Desk

प्रवीण गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk