HW News Marathi
राजकारण

भाजप पूर्णपणे मोदी-शहांच्या कब्जात आहे | निरुपम

मुंबई | “नितीन गडकरी म्हणतात कि भाजप हा व्यक्तिकेंद्री पक्ष मुळीच नाही. परंतु सत्य हे आहे कि भाजपने मोदींच्या नावावरच लोकसभा निवडणूक लढविली आहे. ‘फिर एक बार मोदी सरकार’चे नारे दिले आहेत. यात भाजप कुठे आहे ? मोदी-शहांनी संपूर्ण पक्षाला आपल्या कब्जात घेतले आहे. यात नितीन गडकरी पक्षातली आपली जागा शोधत आहेत काय ?”, असा बोचरा सवाल काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे. नितीन गडकरी यांच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर निरुपम यांनी ट्विट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

“भाजप हा कायम तत्त्वांच्या आधारावर चालत आलेला पक्ष आहे. हा कधीही व्यक्तीकेंद्री पक्ष नव्हता. आमचा पक्ष हा जर मोदीकेंद्री किंवा शहाकेंद्री झाला आहे अशी टीका होत असेल तर ते चुकीचे ठरेल”, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. “आमच्यासाठी राष्ट्रवाद हा निव्वळ निवडणुकीचा आणि प्रचाराचा मुद्दा नाही, तर तो आमचा आत्मा आहे”, असेही गडकरी यावेळी म्हणाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नितीन गडकरी बोलत होते. याच पार्श्वभूमीवर संजय निरुपम यांनी हे ट्विट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य आल्यावर मस्तवाल होवू नका | शरद पवार

swarit

“हे सरकार षंड आणि नामर्दासारखे…”, संजय राऊतांचे शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र

Aprna

‘गोपालगंज ते रायसीना’ असे लालू यादवांचे आत्मचरित्र प्रसिद्ध होत आहे !

News Desk