HW News Marathi
राजकारण

भाजपला काँग्रेस मुक्त नाही, तर मुस्लिम-मुक्त भारत पाहिजे !

बहादुरपुर । ‘भाजपला काँग्रेस मुक्त नाही,तर मुस्लिम-मुक्त भारत पाहिजे’,अशा शब्दात एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. तेलंगणाच्या बहादुरपूरमधील निवडणुकीच्या प्रचारामध्ये ओवैसी बोलत होते.अमित शहा तेलंगणात म्हणाले होते की, ‘हैदराबादला मशिद मुक्त करू’ शहा यांच्या या विधानाचा ओवैसी यांनी खरपूस समाचार घेतला.

ओवैसी पुढे असे देखील म्हणाले की, ‘भारतातील मुस्लिमांसह अल्पसंख्याकांना भाजपकडून घाबरवण्याचा आणि त्यांना दडपण्याचा प्रयत्न होत आहे’.”भाजप काही प्रमाणात तेलंगणा साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहे. पण निवडणुकीत ते हरवले जातील,” असे वक्तव्य ओवैसी यांनी केले आहे.आंध्रप्रदेशमधून तेलंगणा वेगळे झाल्यानंतर तिथे पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणूका होत आहेत. आता येथे टीआरएसची सत्ता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छगन भुजबळ यांना आपले मतदान केंद्रच सापडेना

News Desk

 राहुल गांधी यांना जम्मू-काश्मीरमध्ये ‘नो एन्ट्री’

News Desk

भाजपाचे आमदार अॅड. आशिष शेलार यांना मातृशोक

News Desk