HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

केजरीवाल-ठाकरे भेटीवरुन नितेश राणेंचा जोरदार हल्लाबोल

मुंबई | दिल्लीचे (Delhi) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी काल (शुक्रवारी) मातोश्रीवर ठाकरे गटाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. पंजाबचे आपचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) हेही यावेळी उपस्थित होते. या भेटीदरम्यान, देशातील अनेक समस्यांवर चर्चा केल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. केजरीवाल यांनी यावेळी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवरुन भाजपचे नेते व आमदार नितेश राणे यांनी ठाकरेंना डिवचलं आहे. राणेंनी टि्वट करुन ठाकरेंवर जोरदार हल्ला केला आहे. “आधी मुंबई बॅाम्ब स्फोटातील आरोपींचे समर्थन करणाऱ्यांसोबत मुख्यमंत्री झाले. आता खलिस्तानवाद्यांचं समर्थन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांला भेटतात. यावरून हेच सिद्ध होते की जन्माने संपत्तीत वारसा मिळतो पण आमचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा मिळवता येत नाही”, असे टि्वट नितेश राणे यांनी केले आहे.

काल उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मातोश्री येथे उद्धव ठाकरेंसह अरविंद केजरीवाल यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत भेटीमागचे कारण स्पष्ट केले. अरविंद केजरीवाल म्हणाले, “आजच्या भेटीमध्ये आम्ही बऱ्याच गोष्टींवर चर्चा केली. देशातील समस्यांवर चर्चा केली. देशातील युवकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. शिक्षण घेऊनही अनेकांना नोकरी मिळत नाही. या युवकांना मोठ-मोठी आश्वासनं दिली होती.”

“उद्धव ठाकरे हे वाघाचे पुत्र” 

“2 ते 4 कोटी नोकऱ्या उपलब्ध करण्याची आश्वासने देण्यात आली होती. पण अजूनही नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत. इतकी महागाई वाढली आहे की, लोकांना घरचा खर्च भागवता येत नाही. एकीकडे लोकांचा पगार वाढत नाहीये तर, दुसरीकडे त्यांचा खर्चात मात्र मोठी वाढ होत आहे”, असेही अरविंद केजरीवाल म्हणाले. “उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची चोरी झाली. त्यांचे चिन्ह आणि नाव चोरी करण्यात आले. उद्धव ठाकरे यांचे वडील वाघ होते. हे वाघाचे पुत्र आहेत. संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्यासोबत आहे. येणाऱ्या सर्व निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा मोठा विजय होणार आहे,” असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यभरात मुसळधार!

News Desk

औरंगाबादच्या पोलीस आयुक्तपदी मिलिंद भारंबे

News Desk

आसामचे झाले कश्मीरचे कधी करणार?, उद्धव ठाकरे यांचा भाजप सरकारला सवाल

News Desk