HW News Marathi
राजकारण

भाजप-सेनेची युती हा केवळ सत्तेसाठीचा स्वार्थ !

मुंबई | “गेल्या साडेचार वर्षात शिवसेना-भाजपने कोणतीही विकास कामे केलेली नाहीत. या काळात केवळ लोकांचे लक्ष भरकटविण्यासाठी हे दोन्ही पक्ष एकमेकांवर नुसत्या टीका करत, भांडत राहिले. मात्र, जशा निवडणुका आल्या तसे ते पुन्हा एकत्र आले. हा केवळ सत्तेसाठीचा स्वार्थ आहे”, अशी टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शनिवारी (३० मार्च) भाजप अध्यक्ष अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुजरातला गेले होते. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी या दोन्ही पक्षांवर टीका केली आहे.

“गेली साडेचार वर्षे या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर वारंवार आरोप केले. उद्धव ठाकरे यांनी तर अमित शाहा यांना अफजलखान म्हणून संबोधले. मात्र उद्धव ठाकरे आता अमित शहांसाठी थेट गांधीनगरला पोहोचले. यांचा केवळ सत्तेसाठीचा स्वार्थीपणा आहे”, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. यावेळी नारायण राणे यांनी ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्षा’चे उमेदवार निलेश राणे हे सोमवारी (१ एप्रिल) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती नारायण राणे यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मीच नव्हे तर माझ्यासोबत काँग्रेसचे ७ आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील

News Desk

विद्या चव्हाण यांनी विधानभवनाच्या प्रांगणात रावतेंना का आडविले

News Desk

उच्च न्यायालयाकडून शरद पवारांना दिलासा

News Desk