HW News Marathi
राजकारण

राज्यात येणार ते युतीचेच सरकार !

मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अन्य पक्षांतून शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांत मोठ्या प्रमाणात होणारे पक्षप्रवेश आणि मुख्यमंत्रीपदावरून सुरु असलेली धुसफूस यामुळे भाजप-शिवसेनेची युती कायम राहणार का ? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत होता. दरम्यान आता, “राज्यात येणार तर युतीचेच सरकार येणार”, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्यातील भाजप-शिवसेना युतीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केला आहे. “आम्हाला सत्ता हवी आहे. पण आम्हाला सत्तेची हाव नाही. राज्याच्या विकासासाठी आम्हाला सत्ता हवी आहे”, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

“गेली अनेक वर्षे बोलत होतो त्या गोष्टी आता आपण करुन दाखवल्या आहेत”, असे म्हणत कलम ३७० हटविण्याच्या मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयासह अन्य अनेक निर्णयांसाठी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचे विशेष कौतुक केले आहे. “काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक होता, आहे आणि राहणार हे मोदींनी सिद्ध करुन दाखवले आहे”, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.मुंबईत मेट्रो मार्गिकांच्या भूमिपूजन कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते.

“आपल्या देशाचे अभिमानाचे, अस्मितेचे प्रश्न आपण सक्षमपणे सांभाळत आहात. आपल्या देशाची ताकद, कुवत मोठी होती आणि आहे. फक्त आपल्या देशाला योग्य दिशा दाखविणारे समर्थ नेतृत्त्व हवे होते. ते नेतृत्त्व मोदीजींच्या रूपाने आपल्याला सापडले आहे”, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पियुष गोयल देखील उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशभरात लोकसभेच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

News Desk

उद्यापासून पित्रोदा यांनी ‘सामना’ वाचायला सुरुवात करावी !

News Desk

औरंगाबाद-जालना विधान परिषदेच्या निवडणुकीत अंबादास दानवे विजयी

News Desk