HW News Marathi
राजकारण

सेना-भाजपने राजकारणासाठी बाबासाहेबांचे नाव वापरले

मुंबई | सेना भाजपने राजकारणात दलित मतांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे स्वप्न दाखवत बाबासाहेबांच्या नावाचा वापर केला असल्याचा आरोप कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलाय. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची घोषणा होऊन तीन वर्षे झाली मात्र आद्यप काहीच काम झालेले नाही.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक दर्जाचे स्मारक बांधण्यासाठी दादरच्या इंदू मिल येथे प्रशस्त जागा असून देखील गेल्या अनेक दिवसांपासून या स्मारकाच्या बांधकामाला सुरुवात झाली नाही. मुख्यमंत्री फडणवीसांनी २०१८ साली हे स्मारक बांधण्यात येईल असे आश्वासन दिल्यामुळे पुन्हा एकदा दलित संघटना शांत झालेल्या आहेत.

सरकार फक्त आश्वासन देते प्रत्यक्ष कोणतेही काम करत नसल्याची टिका चव्हाण यांनी आंबेडकर जयंती दिवशी पत्रकारांशी बोलताना केली. सध्याच्या काळात अनेक कारणांमुळे कायदा-सुव्यवस्था कोलमडली आहे आणि भाजपची त्याला मूक संमती आहे की काय असे वाटते असेही यावेळी चव्हाण म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पंतप्रधान मोदींच्या पक्षाची एक्सपायरी डेट लवकरच संपणार !

News Desk

“सरकारमध्ये जे खुर्चांना फेविकॉल लावून बसलेत”, संजय राऊतांची टीका

Aprna

सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींचा खोटेपणा जनतेसमोर आणला !

News Desk
राजकारण

कर्नाटक विधानसभा निवडणूकीत भाजपला झटका बसण्याची शक्यता

News Desk

कर्नाटक | कर्नाटक विधानसभा निवडणूकीत भाजपला झटका बसण्याची शक्यता एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. इंडिया टुडे आणि कार्वी इनसाईटस यांनी केलेल्या एकत्र संशोधनातून कर्नाटकात आज निवडणुका झाल्यास काँग्रेला २२५ पैकी १०१ पर्यंत जागा मिळण्याची शक्यता ओपिनिअन पोलद्वारे वर्तवण्यात आली आहे. तर भाजपच्या जागांमध्ये देखील वाढ होणार असून ७८ ते ८६ पर्यंत पोहोचतील असेही या पोलमधून दर्शविण्यात आले आहे.

कर्नाटकात विधानसभेची निवडणूक येत्या १२ मे रोजी होणार आहे. राज्यात कॉंग्रेसचे सरकारअसून ओपिनिअन पोलनुसार जनता पुन्हा कॉंग्रेसलाच संधी देणार असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. सध्या कॉंग्रेसकडे २२५ जागांपैकी त्यांच्याकडे १२२ जागा आहेत. सध्या भाजपकडे ४३, जनता दल सेक्युलरकडे २९, इतर पक्षांचे १४ आमदार असून १६ जागा रिक्त आहेत.

 

Related posts

हवे तर कोठडीत घाला, पण अडचणीचे प्रश्न विचारतच राहणार!: सचिन सावंत

swarit

औसामध्ये युतीच्या प्रचार सभेसाठी पंतप्रधान मोदी-उद्धव ठाकरे प्रथमच एका मंचावर

News Desk

उध्दव ठाकरेंना अयोध्येत होतोय विरोध 

News Desk