HW News Marathi
राजकारण

स्थानिकांनी केलेल्या प्रश्नांच्या सरबत्तीमुळे मनोज कोटक यांनी काढला पळ

मुंबई | ईशान्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या पदयात्रेला माहुल वासियांच्या असंतोषाचा सामना करावा लागला आहे. कोटक यांनी काल (१७ एप्रिल) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास विद्याविहार येथील आंबेडकर नगर परिसरामधील ओएनजीसी कॉलनीत पदयात्रा काढण्यात आली आहेत. परंतु माहुल वासियांनी त्यांची रॅली अडवत त्यांना घेराव घातला असून नागरिकांचा आक्रोश पाहता अमेदवाराने काढता पायत घेतला.

माहुल वासियांनी त्यांनी केलेल्या कामाबाबत प्रश्नांचा विचारला असता कोटक यांनी तेथून पळ काढला. गेली अनेक वर्षे हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. मात्र, आमच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा जाब या नागरिकांनी विचारला. यावेळी छेडांसह कोटक यांनी त्यांना समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

ईशान्य मुंबईतून शिवसेनेच्या विरोधामुळे भाजपचे महापालिकेतील गटनेते मनोज कोटक यांना किरिट सोमय्यांच्या जागी लोकसभेचे तिकिट मिळाले आहे. परंतु कोटक यांच्या अडचणींमध्ये वाढच होताना दिसत आहे. शिवसेना-भाजपाचे जागावाटप निश्चित झाले असतानाही ईशान्य मुंबईतून कोणाला उमेदवारी द्यायची याचे घोडे अडले होते. किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला होता.मनोज कोटक हे घाटकोपर परिसरामध्ये निवडणूक प्रचारासाठी आले होते. यावेळी भाजपाचे प्रवीण छेडा, खासदार किरिट सोमय्यांसह शिवसेनेचे कार्यकर्तेही हजर होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुली पळवून आणण्यासाठी भाजपने आमदार केले आहेत का?

News Desk

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर शरद पवार यांची पत्रकार परिषद; काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

Aprna

मी काम करते तर तुमच्या पोटात का दुखतं ?

News Desk