HW News Marathi
राजकारण

भाजपकडून ‘देशभक्ती’ हा निवडणुकीचा मुद्दा बनविला जात आहे !

नवी दिल्ली | काँग्रेसच्या पूर्व उत्तर प्रदेशच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी शनिवारी (६ एप्रिल) पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपकडून देशभक्ती हा निवडणुकीचा मुद्दा बनविला जात आहे. गरिबांशी आणि शेतकऱ्यांशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांकडे मात्र भाजपकडून हेतुपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे देखील प्रियांका गांधी यावेळी म्हणाल्या. “देशभक्तीचा मुद्दा उचलून धरला जातो. मात्र देशातील शेतकरी, बेरोजगारी आणि महिलांच्या सुरक्षेसारखे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मागेच राहतात”,असे प्रियांका गांधी यावेळी म्हणाल्या.

“असा कोण आहे जो देशभक्त नाही ? सर्वच जण देशभक्त आहेत. लोकशाहीवर विश्वास म्हणजे सर्वात मोठी देशभक्ती आहे. सजग, जागरूक राहणे ही सर्वात मोठी देशभक्ति आहे”, असेही प्रियांका गांधी यावेळी म्हणाल्या.नोटबंदीच्या दरम्यान लोकांना बँकांच्या रांगांमध्ये उभे राहण्यास सांगितले गेले आणि ही देशभक्ती आहे यामुळे काळा पैसा परत येईल, असे सांगण्यात आले. काळा पैसा परत आला का ?, एकही पैसा परत आला नाही मात्र जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण | तीनपैकी एका आरोपी डॉक्टरला अटक

News Desk

…तरीही मला पक्षात मान-सन्मान मिळतो आहेच !

News Desk

राहुल गांधींविरोधातील दुहेरी नागरिकत्वाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

News Desk