HW News Marathi
राजकारण

भिवंडीचे भाजप उमेदवार कपिल पाटील यांची उमेदवारी रद्द करा, काँग्रेसची मागणी

मुंबई | भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार कपिल पाटील यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. कपिल पाटील हे उत्तर भारतीयांना आमिष दाखवून आचारसंहितेचे उल्लंघन करत असल्याचा आरोप काँग्रेसचे ठाणे ग्रामीण जनरल सेक्रेटरी पंकज गायकवाड यांनी केला आहे. ‘तुम्ही मतदान करून गावी जा, तुम्हाला गावचे तिकीट देखील काढून देऊ’, असे आमिष कपिल पाटील हे उत्तर भारतीयांना आमिष दाखवत असल्याचा आरोप पंकज गायकवाड यांनी केला आहे.

“२९ एप्रिलनंतर गावी जा, मी तुम्हाला सर्वांना तुमच्या गावचे तिकीट काढून देईन”, असे आमिष पंकज गायकवाड यांनी उत्तर भारतीयांना दिले आहे. पंकज गायकवाड यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे कपिल पाटील यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. आचारसंहितेचा उल्लघंन केल्याप्रकरणी कपिल पाटील यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात यावा, अशी मागणी पंकज गायकवाड यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत चौकशीसाठी हजर राहणार?

Aprna

मनोज तिवारी लष्करी गणवेशात बाईक रॅलीत सामील, विरोधकांकडून टीका

News Desk

प्रियांका गांधी आजपासून उत्तर प्रदेश दौऱ्यावर

News Desk