HW News Marathi
राजकारण

केंद्राने केरळ सरकारला पाठविले तब्बल १०२ कोटींचे बिल

नवी दिल्ली | काही महिन्यांपूर्वी केरळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीदरम्यान केंद्राकडून मोठी मदत करण्यात आली होती. यावेळी बचाव आणि मदतकार्यासाठी वापरण्यात आलेल्या हेलिकॉप्टरचे बिल केंद्राकडून केरळ सरकारला पाठविण्यात आले आहे. केंद्राने केरळ सरकारला तब्बल १०२ कोटींचे बिल पाठविले आहे. यामुळे आता सध्या सुरु असलेल्या केंद्र आणि राज्य सरकारच्या वादात पुन्हा भर पडणार असल्याची शक्यता आहे.

केरळमध्ये निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीत भारतीय सैन्याकडून करण्यात आलेल्या सहकार्याची मोठी प्रशंसा देखील झाली. मात्र, आता केंद्राकडून केरळ सरकारला पाठविण्यात आलेल्या बिलामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. याबाबतची माहिती सोमवारी (४ फेब्रुवारी) राज्यसभेत देण्यात आली.

केरळमधील पूरस्थितीदरम्यान भारतीय वायू दलाच्या हेलिकॉप्टरच्या ५१७ फेऱ्यांमध्ये तब्बल ३७८७ नागरिकांचा जीव वाचविण्यात यश आले. तर १३५० टन वजनाचे जीवनावश्यक वस्तू, ५८४ लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर यासाठी आलेल्या खर्चाचे १०२.६ कोटींचे बिल केंद्राने केरळला पाठवल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इतरांच्या खुर्च्यांना टेकू देण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला नाही !

Gauri Tilekar

ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk

ऍट्रॉसिटी कायद्यासंदर्भात  9 ऑगस्टचे भारत बंद आंदोलन मागे घ्या | रामदास आठवले 

News Desk