HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्री फडणवीस विधानसभा बरखास्त करणार ?

मुंबई | “भाजपने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याची तयारी केली असून येत्या २८ फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा बरखास्त करण्याची शक्यता आहे. ही भाजपची रणनीती आहे. अशा प्रकारे धक्का देऊन पुन्हा सत्तेवर येण्याचा भाजपचा विचार आहे”, असा दावा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. त्याचप्रमाणे लोकसभा- विधानसभा निवडणुका एकत्र लढण्यासाठी तयार रहावे”, असे आदेश अशोक चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.

आगामी निवडणुकांच्या दृष्टीने मतांच्या राजकारणासाठी आश्‍वासने दिली जात आहेत. आणखीही मोठ्या घोषणा दिल्या जातील. हा चुनावी जुमला आहे. सध्या काँग्रेसक मतांचे विभाजन टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील आहे. भारिपचे नेते प्रकाश आंबेडकरांनी खासदार व्हावे, ही कॉंग्रेसची इच्छा असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

युतीच्या उमेदवाऱ्या जाहीर झाल्या कि तिथली गर्दी कशी ओसरते बघा !

News Desk

राजकीय नेत्यांनी केला वायूदलाला सलाम

News Desk

#LokSabhaElections2019 : भाजपच्या माढा मतदारसंघाचा तिढा सुटता सुटेना

News Desk
मुंबई

पालघरमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के

News Desk

पालघर | गेल्या काही दिवसांपासून पालघरमध्ये भूकंपाचे हादरे बसत आहेत. काल (७ फेब्रुवारी) सायंकाळी देखील भूकंपाचे धक्के पालघरमधील स्थानिकांना जाणवले होते. तर आज (८ फेब्रुवारी) पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. डहाणू आणि तलासरी या भागात ३.३ रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता नोंदविण्यात आली आहे. सतत होणाऱ्या भूकंपामुळे येथील स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

पालघरमध्ये गेल्या आठवड्यात चार वेळा भूकंपाचे हादरे बसले होते. या भूकंपाच्या हादऱ्यात २ वर्षाच्या चिमुकीलाच मृत्यू झाला आहे. यानंतर प्रशासनाकडून याची दखल घेत भूकंपमापक यंत्रणा बसविण्यात आली आहे. या परिसरात सतत भूकंपाचे धक्के जाणवत असल्यामुळे अशा परिस्थितीचा सामना कसा करायचा याचे भूकंपग्रस्त नागरिकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

 

Related posts

आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे आंदोलन

swarit

आज देखील ती धावली…   

swarit

बाप्पाच्या दर्शनापासून भाविक पाच दिवस वंचित

News Desk