HW News Marathi
राजकारण

मराठा समाजाला 15 दिवसांत आरक्षण देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई । “गेल्या वर्षापासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. मराठा समाजाने आज (१५ नोव्होंबरला समितीने हा अहवाल न्यायालयात सादर केला असून येत्या पंधरा दिवसांत मराठा समाजाला आरक्षण देऊ, त्यामुळे 1 डिसेंबरला मराठा समाजाने जल्लोष करावा”, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिशिंगणापूर येथे बोलताना केले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथील शेतकरी-वारकरी महासंमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास नेवासा तालुक्यातील शिंगणापूर येथे आगमन झाले. त्यांनी अभिषेक करून शनिचे दर्शन घेतले. देवस्थानच्या वतीने त्यांचा सत्कारही करण्यात आला.

फडणवीस म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे. हे आरक्षण देताना इतर समाजाच्या आरक्षणाला मात्र धक्का लागणार नाही. त्यामुळे मराठा समाजाने जल्लोष करण्यास तयार राहावे. शेतक-यांसाठी सुरु केलेली कर्जमाफी योजना आजही थांबवली नाही. ख-या अर्थाने वारकरी व शेतक-यांनी धर्म आणि संस्कृती जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. तसेच पुढे ते असे देखील म्हणाले की, महाराष्ट्राचा धर्म आणि संस्कृती वारकरी संप्रदायाने जिवंत ठेवली आहे. परंतु आम्ही ४ वर्षाच्या कालावधीत आम्ही शेतक-यांच्या पाठीशी आहोत. गेल्या चार वर्षात शेतक-यांच्या खात्यामध्ये ५० हजार कोटी रुपयांची मदत थेट दिली आहे. प्रत्येक अडचणीमध्ये शेतक-यांच्या पाठीमागे आमचे सरकार आहे.

यावेळी चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री प्रा.राम शिंदे, आमदार गिरीश महाजन, आमदार शिवाजीराव कर्डीले, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार मोनिका राजळे खासदार दिलीप गांधी, संभाजी दहातोंडे होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजू शेट्टींना सरकारकडून चर्चेचे निमंत्रण; चक्काजाम आंदोलन तात्पुरते स्थगित

Chetan Kirdat

पालघरमध्ये भाजप विजयी

News Desk

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत टॉलिवूडने केले मतदान

News Desk