HW News Marathi
राजकारण

देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गाच्या अडचणी सोवडविण्याबाबत मुख्यमंत्र्याचे निर्देश

मुंबई | मुख्यमंत्र्यांनी मुंबईत घेतलेल्या बैठकीत देसाईगंज – गडचिरोली रेल्वे मार्गासंबंधी ज्या अडचमी आहेत त्या येत्या ३ ते ४ महिन्यात सोडवून भूमिपुजनाची तयारी पूर्ण करावी, असे निर्देश दिले आहेत. देसाईगंज – गडचिरोली या मंजूर रेल्वे लाईनच्या भूमीपूजनाची तयारी करून त्वरीत काम सुरू करण्यासंदर्भात मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय नेते केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थिती बैठक पार पडली.

या बैठकीत राज्याचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे आदिवासी विकास व वनराज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, खासदार तथा भाजपा आदिवासी आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक नेते उपस्थित होते. तसेच बैठकीला संबंधित एस. ई. रेल्वे विभागाचे सर्व अधिकारी, वनविभाग, महसूल विभाग, गृह विभाग, बांधकाम विभाग व संबंधित सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत दादा पाटील यांनी देसाईगंज – गडचिरोली रेल्वे मार्गासंदर्भातील सर्व अडचणी लवकरात लवकर दूर करून भूमीपूजनाची तयारी सुरू करावी, असे तातडीचे आदेश दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘सामना’च्या अग्रलेखातील ‘बुरखा बंदी’च्या भूमिकेवर संजय राऊतांचे स्पष्टीकरण

News Desk

#MarathaReservation : ही श्रेय घेण्याची वेळ नाही !

News Desk

मोदींची वागणूक पंतप्रधानपदाच्या नैतिकतेला साजेशी असायला हवी !

News Desk