HW News Marathi
राजकारण

लोकसभेच्या जागांसंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्या मुख्यमंत्री-पक्षप्रमुखांची भेट

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना-भाजपच्या युतीबाबत संभ्रम कायम होता. मात्र, १८ फेब्रुवारीला अखेर शिवसेना-भाजपने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप-शिवसनेच्या युतीची अधिकृत घोषणा केली. यावेळी लोकसभेसाठी शिवसेनेला २३, भाजपला २५ जागा तर विधानसभेसाठी ५०-५० जागांचा फॉर्म्युला निश्चित झाला होता. मात्र, आता भाजप-शिवसेनेत या जागांवरून तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. याबाबत चर्चा करून मार्ग काढण्याकरिता गुरुवारी (७ फेब्रुवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट होणार असल्याची माहिती मिळत आहे.

सध्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेना नेते आणि पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यात जालन्याच्या जागेवरून प्रचंड वाद सुरु आहेत. रावसाहेब दानवे आणि सुभाष देशमुख यांनी आज (४ मार्च) अर्जुन खोतकर यांची भेट घेतली होती. मात्र, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच माझ्याबाबतीत अंतिम निर्णय घेतील”, असे खोतकर म्हणाले होते.

“युती झाली तर ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्या नको”, अशी मागणी शिवसैनिकांनी अनेक दिवस आधीच उद्धव ठाकरेंकडे केली होती. किरीट सोमय्या यांनी अनेकदा उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. म्हणून शिवसैनिकांचा किरीट सोमय्यांवर प्रचंड राग असल्यानेच त्यांनी ही भूमिका घेतली आहे. “किरीट सोमय्यांना उमेदवारी दिली तर शिवसैनिक त्यांच्यासाठी प्रचार करणार नाहीत. तसेच एकही शिवसैनिक सोमय्यांना मत देणार नाही”, असेही शिवसैनिकांकडून पक्षप्रमुखांना सांगण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“शिवसेना ही मोठी संघटना, यात दोन गट मला नको,” दीपाली सय्यद यांची भावना

Aprna

कर्नाटक निवडणुक, दुपारपर्यंत ५६ टक्के मतदान

News Desk

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० यापूर्वीच रद्द करायला हवे होते !

News Desk