HW News Marathi
राजकारण

शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन केलेली समिती सरकारच्या हातचे बाहुले | राजू शेट्टी

उस्मानाबाद | शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आलेल्या ऊसदर नियंत्रण समिती हे सरकारच्या हातातील बाहुले झाले असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. शेट्टी यांनी उस्मानाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होता. यावेळी शेट्टी यांनी कोल्हापूर आणि सांगलीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आज(११ नोव्हेंबर)चे चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. परंतु कोल्हापूर आणि सांगलीत बंद मागे घेतला असला तरी इतर जिल्ह्यात बंद सुरूच राहणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

‘एफआरपी’ थकवलेल्या कारखान्यांना गाळप परवाना देण्यात येऊ नये, असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. तरी सुद्धा अनेक कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले. बहुतांश कारखाने सुरूही झाले. यापैकी काही कारखान्यांनी साखर आयुक्तांना खोटी माहिती सादर करून ‘एफआरपी’ दिल्याचे भासविले. अशा कारखान्यांच्या यादीत राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याही कारखान्याचा समावेश आहे. सरकार आणि कारखानदार संगनमताने शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत असल्याचा आरोपही शेट्टी यांनी केला.

दरम्यान, आपण लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा सर्व प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेस संघटनेचे प्रकाश पोकळे, पूजा मोरे, माणिक कदम, जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे आदींची उपस्थिती होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आज भगवे वस्त्र नेसून बलात्कार केले जातायत, दिग्विजयसिंहांचे वादग्रस्त विधान

News Desk

साध्वी प्रज्ञा यांची तब्येत आता ठीक असेल तर त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवा !

News Desk

नरेंद्र मोदी हे माझे कोणत्याही प्रकारे शिष्य नाहीत !

News Desk
महाराष्ट्र

दिवाळीनंतरही राज्यातील भारनियमन बंद राहणार

Gauri Tilekar

मुंबई | राज्यात दिवाळीदरम्यान भारनियमन बंद करण्यात आले होते. यामुळे सामन्यांची होणारी मोठी गैरसोय टळली होती. आता दिवाळी नंतरही राज्यातील कोळशाची तूट भरून निघाली असल्याने आता भारनियमन बंदच राहणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

राज्यातील कोळशाच्या टंचाईमुळे लोकांना ऑक्टोबर महिन्यात देखील भारनियमनाच्या समस्येला सामोरे जावे लागले होते. दरम्यान, ‘राज्यातील वीजकेंद्रांमध्ये आता कोळशाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे दिवाळीत बंद करण्यात आलेले भारनियमन आता पुन्हा सुरू करण्यात येणार नाही’, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली आहे.

Related posts

९२ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ग्रंथ दिंडीने सुरुवात

News Desk

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड !

News Desk

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील ‘हे’ महत्वाचे निर्णय

News Desk