HW News Marathi
राजकारण

शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन केलेली समिती सरकारच्या हातचे बाहुले | राजू शेट्टी

उस्मानाबाद | शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आलेल्या ऊसदर नियंत्रण समिती हे सरकारच्या हातातील बाहुले झाले असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. शेट्टी यांनी उस्मानाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होता. यावेळी शेट्टी यांनी कोल्हापूर आणि सांगलीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आज(११ नोव्हेंबर)चे चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. परंतु कोल्हापूर आणि सांगलीत बंद मागे घेतला असला तरी इतर जिल्ह्यात बंद सुरूच राहणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

‘एफआरपी’ थकवलेल्या कारखान्यांना गाळप परवाना देण्यात येऊ नये, असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. तरी सुद्धा अनेक कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले. बहुतांश कारखाने सुरूही झाले. यापैकी काही कारखान्यांनी साखर आयुक्तांना खोटी माहिती सादर करून ‘एफआरपी’ दिल्याचे भासविले. अशा कारखान्यांच्या यादीत राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याही कारखान्याचा समावेश आहे. सरकार आणि कारखानदार संगनमताने शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत असल्याचा आरोपही शेट्टी यांनी केला.

दरम्यान, आपण लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा सर्व प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेस संघटनेचे प्रकाश पोकळे, पूजा मोरे, माणिक कदम, जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे आदींची उपस्थिती होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीची आजचीच घडी कायम राहील, ‘ती’ विस्कटावी असे वातावरण देशात नाही !

News Desk

‘भीम आर्मी’च्या मुंबईतील कार्यक्रमाला परवानगी देण्यास पोलिसांचा नकार

News Desk

एका निरपराध व्यक्तीच्या मृत्यूला राहुल गांधी जबाबदार !

News Desk