HW News Marathi
राजकारण

EVMHacking : ‘त्या’ पत्रकार परिषदे मागे काँग्रेसचा हात !

नवी दिल्ली | ईव्हीएम हॅकिंग प्रकरणावरून भाजपने काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. लंडनमधील पत्रकार परिषद ही काँग्रेसची पूर्व नियोजित असून या पत्रकार परिषदेचे आयोजक आशीष रे यांचे काँग्रेसशी संबंध असल्याचा दावा केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. प्रसाद यांनी आज (२२ जानेवारी) पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

या पत्रकार परिषदेत प्रसाद यांनी काँग्रेसवर आरोप करत म्हटले की, काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल लंडनमधील हॅकेथॉनमध्ये काय करत होते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणात भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूचे राजकारण होत आहे, असेही प्रसाद यांनी सांगितले. अशा आरोपबाजीमधून काँग्रेस २०१९ साली होणाऱ्या पराभवाचे कारण शोधत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांची भेटही घेतली होती, असा आरोप भाजपने केला आहे. तसेच काँग्रेसने या प्रकरणातून देशातील ९० कोटी मतदारांनी दिलेल्या जनादेशाचा अपमान केला असून, देशाला जगात बदनाम करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत असल्याचे भाजपने म्हटले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात जनतेवर विषप्रयोग करणारे सरकारः खा. अशोक चव्हाण

News Desk

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी प्रयत्न करा – रविंद्र चव्हाण

Manasi Devkar

पश्चिम बंगालमधील हिंसाचारानंतर एक दिवसआधीच प्रचारबंदी घटनाविरोधी | काँग्रेस

News Desk