HW News Marathi
राजकारण

अवनीच्या शिकारीवरून आता काँग्रेसचाही भाजपवर निशाणा

नवी दिल्ली । नरभक्षक वाघिणीला ठार केल्याप्रकरणी भाजपा सरकारवर सर्व स्तरातून टीका होत आहे. सर्व पक्षांकडुन अवनी मुद्यावर राजकारण सुर झाले आहे . आदित्य ठाकरे, मेनका गांधी यांनी सरकारवर बोचरी टीका केली आहे. आता या प्रकरणामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सुद्धा मागे हटले नाहीत. राहुल यांनी सुद्धा भाजपा सरकारवर जोरदार टीका केली आहे.अवनी वाघिणीला ठार केल्याच्या प्रकाराचा निषेध राहुल गांधींनी नोंदवला आहे. महात्मा गांधी यांनी मांडलेला विचार ट्विट केला आहे.

”देशात प्राण्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीवरुन देशाची महानता ठरते,असं महात्मा गांधी यांनी म्हटले होते”.

‘वन खात्याचे नाव बदलून शिकारी खाते असे करायला हवे‘ अशी टीका टी-१ वाघिणीला ठार मारल्याप्रकरणी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्वीटरवरून वन मंत्रालयावर केली आहे.

तसेच मेनका गांधी यांनी ही अर्थमंत्री आणि राज्याचे वन विभाग मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीका केली आहे,”अवनीच्या अतिशय क्रूरपणे करण्यात आलेल्या हत्येमुळे मला तीव्र दुःख झालं आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी असे आदेश अनेकदा दिले आहेत. त्यांच्या आदेशानूसार करण्यात आलेली ही तिसरी वाघाची हत्या आहे, असं मनेका गांधी यांनी म्हटलं आहे. वाघिणीला बेशुद्घ करुन पकडणं शक्य होतं, मात्र तिला ठार करण्यात आलं”. त्यासाठी गुन्हेरारी पार्श्वभूमी असलेल्या शार्प शूटरची नियुक्ती करण्यात आली”, असा आरोप मनेका गांधी यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा, संप सुरूच !

News Desk

आजच्या तारखेला निवडणुका झाल्या तर काय असेल भाजपची स्थिती ?

News Desk

मोदी पक्षातील ज्येष्ठांचा आदर करीत नाहीत तर जनतेच्या विश्वासाचा आदर काय करणार ?

News Desk