HW News Marathi
राजकारण

राहुल गांधी जम्मू-काश्मीरला रवाना, विमानतळावर रोखण्याची शक्यता

नवी दिल्ली | कलम ३७० हटवल्यानंर पहिल्यादांच काँग्रेस नेते राहुल गांधी हे शनिवारी (२४ ऑगस्ट) जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहे. राहुल गांधी यांच्यासोबत विरोधी पक्षातील ९ नेतेही असणार आहे. राहुल गांधी काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जाणार आहे. परंतु जम्मू-काश्मीरच्या प्रशासनाकडून राहुल यांच्या दौऱ्याला खीळ बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राहुल गांधी जम्मू-काश्मीरच्या दिशने रवाना झाले आहे. राहुल गांधी यांना काश्मीच्या श्रीनगर विमानतळावर रोखल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जम्मू- काश्मीरच्या सूचना आणि जनसपंर्क विभागाने विरोधी नेत्यांना आवाहन केले आहे की, “श्रीनगर दौऱ्यावरती येऊ नका. यामुळे अन्य लोकांची गैरसोय होईल. आताचा कुठे येथील जनजीवन पूर्वपदावर येत असून ते विस्कळीत करण्याचा प्रयत्न करू नये.”

कलम ३७० हटविल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये जवानांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. मात्र या मुद्द्यावरुन काँग्रेसने भाजपवर टीकेचे लक्ष्य केलेले असताना जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधींना टोला लगावला होता. विमान पाठवतो, स्वत: येऊन काश्मीरची परिस्थिती पाहा असे आवाहन केले होते. त्यावर राहुल गांधी यांनीही सत्यपाल मलिक यांना विरोधी पक्षाचे नेते आणि मी जम्मू काश्मीर, लडाखला भेट देतो. तुमच्या निमंत्रणासाठी मी कृतज्ञ आहे असे त्यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर आज राहुल गांधी जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निमंत्रण स्वीकार करत तेथे जाण्यासाठी रवाना झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजेंनी राज्यसभेत मांडला मराठा आरक्षणाचा मुद्दा

News Desk

मी घड्याळाच्या चिन्हासमोरचे बटण दाबले अन् कमळाला मत गेले !

News Desk

आजम खान यांनी माझ्यावर अ‍ॅसिड हल्ला करण्याचा कट रचला !

News Desk