HW News Marathi
राजकारण

कॉंग्रेसने जनतेला मुर्ख बनविले

तुमाकुरू | कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभांना रंगत आलेली पहायला मिळत आहे. निवडणूकीसाठी अवघे काही दिवसच हातात राहील्यामुळे सर्वच बड्या नेत्यांनी कर्नाटक निवडणूकीकडे विषेश लक्ष दिल्यानेआरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तुमाकुरु येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलताना शनिवारी पंतप्रधान मोंदीनी कॉंग्रेसवर निशाना साधला. कॉंग्रेसने गरीबांचा कळवळा असल्याचे भासवत जनतेला मुर्ख बनविले असल्याचा आरोप यावेळी मोदींनी कॉंग्रेसवर केला.

 

कॉंग्रेस पक्ष माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या काळापासून गरीब जनतेचा वापर करत आहे. आजपर्यत या गरीब जनतेसाठी कॉंग्रेसने काहीच केले नाही त्यामुळे जनता कॉंग्रेसला कंटाळली असल्याचे मोदी म्हणाले. त्याचबरोबर कॉंग्रेस आणि जनता दलात अप्रत्यक्ष युती असल्याचा आरोपही मोदींनी यावेळी केला. दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत असल्याचे भासवतात मात्र, बंगळुरूमध्ये जनता दलाचा काँग्रेसच्या महापौराला पाठिंबा असल्याचे मोदी यावेळी बोलताना म्हणालेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…गरीबांच्या घरी जेवण नाय”; ‘मविआ’च्या आमदारांनी चूल रचून गॅस दरवाढीचा केला निषेध

Aprna

रामराजे नाईक निंबाळकर शिवसेनेच्या वाटेवर

News Desk

#LokSabhaElections2019 : अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk