HW News Marathi
राजकारण

कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीची आता डिपॉजिट वाचविण्‍याचीच लढाई | आशिष शेलार

मुंबई | “मुंबईतील कॉंग्रेस राष्‍ट्रवादीचे उमेदवार आतापर्यंत रणांगण सोडून पळत होते. त्‍यामुळे उमेदवार मिळविण्‍याची लढाई लढणा-या कॉंग्रेस राष्‍ट्रवादीला आता डिपॉजिट वाचविण्‍याचीच लढाई लढावी लागणार आहे”, अशी बोचरी टीका मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे. “पंतप्रधानांना मुंबईतून अ‍भूतपूर्व पाठिंबा मिळेल आणि त्‍यांना पाठींबा देणारे सर्व खासदार मुंबईतून निवडून येतील, कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीचा पराभव आता निश्चित आहे”, असाही विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.

“देशहितासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्‍दव ठाकरे यांनी युतीची भूमिका घेतली त्‍याबद्दल त्‍यांचे अभिनंदन करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्‍या सर्वांगीण विकासाचे जे भव्‍य स्‍वप्‍न पाहिले आहे ते प्रत्‍यक्षात उतरविण्‍यासाठी अहोरात्र झटणारे भाजप राष्‍ट्रीय अध्‍यक्ष अमित शाह, राज्‍याचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे या सगळयांचेही अभिनंदन करतो”, असे आशिष शेलार यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जदयुच्या एका आमदाराचा राजीनामा

News Desk

राज्याच्या आरोग्य उपकेंद्रातील परिचारिकांना १० हजार रुपये मानधन दया !

News Desk

फसणवीस सरकार’राज्यातील जनतेशी ‘ब्ल्यू व्हेल’गेम खेळत आहे ! सचिन सावंत

News Desk