HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : काँग्रेस आज महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार

मुंबई । निवडणूक आयोगाने १७ व्या लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक काल (१० मार्च) जाहीर केले आहे. यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांमध्ये उमेदवारांच्या यादी जाहीर करण्याच्या तयारीला लागले आहेत. यात काँग्रेस आज महाराष्ट्रातील पहिली १२ उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

दिल्लीत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीदरम्यान आज महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यातील ज्या जागांवरून विशेष वाद नाही. त्या उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार आहेत. पहिल्या यादीतील १२ उमेदवारांची नावे आज घोषित होईल. सोलापुरातून सुशीलकुमार शिंदे तर नांदेडमधून अमिता चव्हाण यांच्या नावेवर शिक्कमोर्तब झाला आहे.

याआधी काँग्रेसने उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील १५ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यात स्वत: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नावाचाही समावेश आहे. राहुल गांधी उत्तर प्रदेशातील अमेठी तर सोनिया गांधी रायबरेली या पारंपरिक मतदारसंघामधून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. काँग्रेसने जाहीर केलेल्या १५ उमेदवारांपैकी ११ जागा उत्तर प्रदेश तर ४ जागा गुजरातमधील आहेत.

काँग्रेसच्या उमेदवारांच्या नावाची यादी

नंदुरबार – के सी पाडवी
धुळे – रोहिदास पाटील
रामटेक – मुकुल वासनिक
हिंगोली – राजीव सातव
नांदेड – अमिता चव्हाण
सोलापूर – सुशीलकुमार शिंदे
गडचिरोली – डॉ. नामदेव उसेंडी
वर्धा – चारुलता टोकस
यवतमाळ – माणिकराव ठाकरे
मुंबई दक्षिण – मिलिंद देवरा
मुंबई उत्तर मध्य – प्रिया दत्त
मुंबई दक्षिण-मध्य – एकनाथ गायकवाड किंवा वर्षा गायकवाड
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ करण्याचा प्रस्ताव मंजूर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘या’ शहरांचे बदलेले नाव

Aprna

या सरकारला शेतकऱ्यांची काहीच पडलेली नाही !

News Desk

भाजपला तुम्ही दाबण्याचा प्रयत्न केला तरीही भाजप दबली जाणार नाही !

News Desk