HW News Marathi
राजकारण

हार्दिकच्या टिकेला काँग्रेसचे प्रत्युत्तर

इंदूर | पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी राहुल गांधींची खिल्ली उडवल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. हार्दिक यांनी राहुल यांच्या पेहरावाची आणि देहबोलीवरून टिप्पणी केली. हार्दिक यांनी म्हटले की, राहुल गांधी अनेकदा भाषणादरम्यान आपल्या सदऱ्याच्या बाह्या वर करत असतात. याचा त्रास होत असले तर राहुल यांनी योग्य कपडे घातले पाहिजेत. राहुल गांधींनी जीन्स घालावी असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा राजस्थानमध्ये गेले तेव्हा त्यांनी जोधपुरी सूट घातला होता. यानंतर लोकांनी त्यांना स्वीकारले होते. काळ बदलत असतो. त्यामुळे राहुल गांधींनीही खादीचे कपडे घालणे व सदऱ्याच्या बाह्या वर करण्याची सवय सोडली तर देश त्यांनाही स्वीकारेल, असे हार्दिक यांनी म्हटले.

यानंतर काँग्रेस नेत्यांकडून हार्दिक यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देण्यात आले. हार्दिक पटेल हल्ली फॅशन डिझायनरचेही काम करतात हे आम्हाला माहिती नव्हते. एखाद्याचे कपडे किंवा सदरा कसा असावा, हे सांगणे डिझायनरचेच काम असते. त्यामुळे हार्दिक यांनी राहुल गांधींना नसते सल्ले देण्याच्या फंदात पडू नये, असेही काँग्रेस कडून सांगण्यात आले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आता शाळेत हजेरी लावताना ‘जय हिंद’, ‘जय भारत’ म्हणा

News Desk

जाणून घ्या…शिंदे सरकारमधील अनुभवी सुधीर मुनगंटीवार यांच्या काही खास गोष्टी

Aprna

कृषी क्षेत्रातला विकास पाहायला बारामतीला या

News Desk
राजकारण

राजेश कुंटेंच्या याचिकेवर 10 ऑगस्टला होणार सुनावणी

News Desk

मुंबई | लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भिवंडीत 6 मार्च 2014 रोजी राहुल गांधी यांनी महात्मा गांधीजींची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच घडवून आणली, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याविरोधात आरएसएसचे शहरजिल्हा कार्यवाहक राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर भिवंडी कोर्टात आज सुनावणी ठेवण्यात आली होती. या सुनावणी साठी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी मुंबईत उपस्थित आहेत. संबंधित याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने पुढील सुनावणी 10 ऑगस्टला होणार असल्याचे सांगितले आहे . सुनावणीनंतर माध्यमांशी बोलताना राहुल यांनी विचारधारेसाठी माझी लढाई सुरु आहे आणि सुरुच राहील अशी प्रतिक्रीया दिली आहे.

 

Related posts

उद्धव ठाकरे म्हणाले, हे बरे नाही !

News Desk

“ही सर्व मंडळी ED मुळेच आली ती म्हणजे…,” अखेर फडणवीसांनी सभागृहात केले मान्य

Aprna

‘बा–चा–बा–ची’तून देशाला आणि जनतेला काय मिळेल?

News Desk