HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्र्यांची विखे-पाटील यांना अवमानता नोटीस

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या बिल्डर्सना फायदा मिळवून देण्याच्या उद्देशाने मुंबईच्या विकास आराखड्यात बदल करून तब्बल १ लाख कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला होता. विखे-पाटील यांनी केलेल्या या आरोपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विखे-पाटील यांना अवमानता नोटीस पाठवली आहे. विखे-पाटील यांचे हे सर्व आरोप तथ्यहीन असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हटले आहे.

“मुख्यमंत्री फडणवीस यांनी विकास आराखड्यात बदल करून १ लाख कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. मुख्यमंत्री कार्यालय आणि बिल्डर्समध्ये १० हजार कोटी रुपयांचा सौदा झाला असून त्यापैकी ५ हजार कोटी रुपये आधीच मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविण्यात आले आहेत”, असा गंभीर आरोप विखे-पाटील यांनी केला होता. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी मात्र त्यांच्यावरील हे सर्व आरोप फेटाळून लावत विखे-पाटील यांना अवमानता नोटीस पाठवली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘दैनिक सामना’ मुख्य पानावर शिंदे-फडणवीस सरकारची जाहिरात; राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या

Aprna

Saradha Scam : सीबीआयकडून पी.चिदंबरम यांच्या पत्नीविरोधात आरोपपत्र दाखल

News Desk

नागरिकांना पुराची भीषणता जाणवणार नाही, यासाठी प्रशासनाने समन्वयातून पूरपरिस्थिती हाताळावी! –छगन भुजबळ

Aprna