HW News Marathi
राजकारण

क्रिकेट विश्वाचा पहिला सम्राट हरपला | आठवले

मुंबई | भारतीय क्रिकेटची गुणवत्ता जागतिक स्तरावर पहिल्यांदा सिद्ध करणारा क्रिकेटविर अजित वाडेकर होते. कसोटी क्रिकेटपटू, कर्णधार , प्रशिक्षक अश्या सर्व भूमिकांतून आपल्या गुणवत्तेचा क्रिकेटरसिकांच्या मनात कायमचा उमटविलेले आणि संपूर्ण आयुष्य क्रिकेट जगलेल्या अजित वाडेकर यांच्या निधनाने क्रिकेटविश्वाचा पहिला अनभिषिक्त सम्राट हरपला आहे अश्या शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिवंगत अजित वाडेकर यांना आदरांजली वाहिली आहे.

दिवंगत अजित वाडेकर यांनी कसोटी क्रिकेट च्या सलग तीन सिरीज त्यांच्या कर्णधारपदाच्या काळात भारताला जिंकून दिल्या. परदेशात पहिला विजय भारतीय क्रीकेट संघाला मिळवून देणारे पाहिले कर्णधार ते होते. अजित वाडेकर हे अर्जुन पुरस्काराचे तसेच भारताच्या अत्यंत सन्मानाच्या पद्मश्री किताबाचे ते मानकरी ठरले होते.

दिवंगत अजित वाडेकर यांनी प्रशिक्षक पदाच्या काळात अनेक क्रिकेटपटू घडविले.त्यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून ही खूप मोठी कामगिरी केली आहे. अजित वाडेकर या महान क्रिकेटविराच्या निधनाने भारतीय क्रिकेट विश्वाची मोठी हानी झाली आहे अशी शोकभावना रामदास आठवले यांनी पाठविलेल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आपला पराभव होणार याचा अंदाज असल्यानेच पवारांनी बारामतीबाबत ‘ते’ विधान केले !

News Desk

अयोध्या प्रकरणाची आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

swarit

राज ठाकरे-आशिष शेलार यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा

News Desk
मुंबई

राष्ट्रध्वज पदपथावर, ‘मुंबईत तिरंगा उठावो अभियान’

News Desk

मुंबई | काल स्वातंत्र्य दिन देशात उत्साहात साजरी करण्यात आला. एका दिवसासाठी का होईना पण प्रत्येकाचे भारत मातेवरचे प्रेम उसळून आले. अनेक ठिकाणी सकाळी ध्वजारोहण करण्यात आलं तसेच अनेक देश प्रेमींनी भारताचा झेंडा आपल्या छातीवर, गाडीवर, हातात अभिमानाने बाळगला होता. पण जसा दिवस सरत गेला तसं स्वातंत्र्य दिवसाचे प्रेम कमी होत गेले. छातीवरचे झेंडे खाली रस्त्यावर पडले. अभिमानाने लावलेला झेंडा संध्याकाळी मुंबईच्या धावपळीच्या जीवनात पायाखाली येतो पण उचलून बाजूला ठेवण्याचे कष्ट खूप कमी नागरिक घेतात.

म्हणून असे काही तरी एक पाऊल पुढे येतं राष्ट्राभिमानी समितीच्या व ज्ञानदा प्रबोधन संस्थेच्यावतीने घेण्यात आलेल्या “तिरंगा उठवो मोहिमे” अंतर्गत पदपथावर पडलेले राष्ट्रध्वज उचलणं तसेच ते नजरेसमोर दिसूनही काही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात व उचलण्याची त्यांची मानसिकता नसते कारण त्यांची राष्ट्रभक्ती ही फक्त स्वतंत्रता दिनी व प्रजासत्ताक दिनीच जागृत होत असते अश्यावेळी ते उचलण्याचे कार्य गेली १३ वर्षे करत असून ह्यावर्षी ह्या मोहिमेला १४ वर्षे पूर्ण झाली. तरी गेल्या १३ वर्षात हे राष्ट्रध्वज पदपथावर पडण्याची संख्या फारच कमी झाली आहे ही राष्ट्राभिमानी समितीच्या व ज्ञानदा प्रबोधन संस्थेच्या मोहिमेसाठी समाधानाची बाब आहे.

सुरुवातीला माहीम, दादर परिसरात दोन वर्षात तब्बल ८लाखाच्या वर राष्ट्रध्वज मिळाले आणि ह्यावर्षी सकाळपासून आम्ही माहीम ते सिद्धिविनायक फिरलो पण अवघे ७० ते ८० राष्ट्रध्वज आम्हाला मिळाले. आज ह्या मोहिमेमुळे जे काही परिवर्तन झाले ते आमच्या दृष्टीने जिकल्याची भावना व आनंदाची भावना आहे. आजच्या कार्यक्रमात समितीचे अध्यक्ष प्रशांत पळ, मार्गदर्शक विलास फडके,उपाध्यक्ष रुपेश शिगवण, सेक्रेटरी मनोज मिसाळ , राज दुदवडकर, वनिता चेटियार, भास्कर देवडिगा, योगेश सारंगुल, अजय पोतदार सहभागी झाले होते. असे प्रशांत पळ यांनी सांगितले.

Related posts

बेस्टच्या संपाचा नववा दिवस, मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

News Desk

मुंबईत उद्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

News Desk

पोद्दार रुग्णालयातील गैरसोय झालेल्या रुग्णांची आदित्य ठाकरेंनी मागितली माफी

News Desk