HW News Marathi
राजकारण

नारायण राणेंची खासदारकी काढून घेण्याची मागणी

मुंबई | “नारायण राणेंना भाजपकडून देण्यात आलेली खासदारकी काढून घेण्यात यावी”, अशी मागणी सिंधुदुर्गातील एका भाजप नेत्याने केली आहे. सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी भाजप प्रभारी सरोजनी पांडे यांच्याकडे नारायण राणेंना भाजपकडून देण्यात आलेली खासदारकी काढून टाकण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग भाजप नेत्यांच्या मनात नारायण राणेंबद्दल नाराजी असल्याचे चित्र दिसत आहे.

सिंधुदुर्गातील भाजप नेत्यांमध्ये नारायण राणेबद्दल असंतोष वाढत चाललेला दिसत आहे. भाजपच्याच कोट्यातून सध्या राज्यसभेचे खासदार असणाऱ्या नारायण राणेंनी त्यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या विश्वास यात्रेच्या वेळी भाजपवर निशाणा साधला होता. त्यामुळे भाजपमध्ये सध्या नारायण राणेविरोधी वातावरण आहे. म्हणूनच भाजपकडून नारायण राणेंना देण्यात आलेली खासदारकी काढून घेण्यात यावी, अशी मागणी सध्या सिंधुदुर्गातील भाजप नेत्यांकडून केली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#LokSabhaElections2019 : पार्थ, सुजयच्या पाठोपाठ आता आदित्य ठाकरे देखील निवडणुकीच्या रिंगणात ?

News Desk

शरद पवारांच्या भूमिकेवर संजय राऊत म्हणतात…!

News Desk

राज ठाकरेंच्या जाहीर सभांचा खर्च कुठल्या पक्षाच्या खात्यात दाखविणार ?

News Desk
राजकारण

मी कधीच पत्रकार परिषदांना घाबरलो नाही !

News Desk

नवी दिल्ली | माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. “मी कधीच पत्रकार परिषदांना घाबरलो नाही. मी पत्रकार परिषदांना घाबरणारा पंतप्रधान नव्हतो. मी पंतप्रधान असताना परराष्ट्र दौऱ्यावरून परतल्यानंतर कायमच पत्रकार परिषद घेत होतो”, असे मनमोहन सिंग यावेळी म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र दौऱ्यांची प्रचंड चर्चा होताना दिसते. मात्र ते देशात परतल्यानंतर कधीही पत्रकार परिषद घेत नाहीत. याच पार्श्वभूमीवर मनमोहन सिंग बोलत होते. “चेंजिंग इंडिया’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

मनमोहन सिंग यांनी केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये वाढलेल्या ताणाच्या पार्श्वभूमीवर भाष्य केले आहे. “आरबीआयची स्वायत्तता आणि स्वातंत्र्याचा सन्मान करायला हवा. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक यांचे नाते पती-पत्नीसारखे असते. या दोघांमध्येही मतभेद असतात. परंतु तरीही त्यांना एकत्र राहून समाधान शोधणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे केंद्र आणि रिझर्व्ह बँकेमध्ये देखील योग्य ताळमेळ असणे अत्यंत महत्त्वाचे असते”, असे मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकमध्ये मोठा ताण निर्माण झाला आहे. याचमुळे उर्जित पटेल यांनी आपल्या गव्हर्नर पदाचा राजीनामा दिल्याचे म्हटले जात आहे. परंतु, उर्जित पटेल यांनी मात्र आपण काही वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचे म्हटले होते. उर्जित पटेल हे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या इतिहासात आपल्या पदाचा राजीनामा देणारे पहिलेच गव्हर्नर आहेत.

Related posts

संतोष बांगरांनी मंत्रालयातील पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप; काय आहे प्रकरण

Aprna

द्रौपदी मुर्मी देशाच्या 15 व्या राष्ट्रपती, आज सरन्यायाधीश देणार गोपनीयतेची शपथ

Aprna

शहांसाठी ठाकरे गुजरातमध्ये दाखल, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण

News Desk