HW News Marathi
राजकारण

काँग्रेसचा इतका दारुण पराभव झाला तरीही राहुल गांधींमध्ये सुधारणा झाली नाही !

नवी दिल्ली | “यंदाच्या लोकसभेत काँग्रेसचा इतका दारुण पराभव झाला. तरीही राहुल गांधी यांच्यात काहीही सुधारणा झालेली नाही”, असे वक्तव्य असे बोचरे वक्तव्य भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे सध्या वायनाड दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे.

“मी कठोर भाषेत बोलतो. परंतु, पंतप्रधान मोदी हे देशाला विभागण्याचा प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान मोदी लोकांच्या मनात राग आणि द्वेष निर्माण करून देशातील नागरिकांना विभागण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपच्या या खोटेपणाविरुद्ध काँग्रेसचा लढा सुरूच राहिल”, असे राहुल गांधी यावेळी म्हणाले. दरम्यान, राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला रविशंकर प्रसाद यांनी प्रत्युत्तर दिले आहे. या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा इतका मोठा पराभव झाला तरीही राहुल गांधींमध्ये कोणतीही सुधारणा झाली नसल्याची टीका यावेळी रविशंकर प्रसाद यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#RamMandir : अयोध्येत बाबरी मशिदीच्या जागेवर राम मंदिर उभारू नये !

News Desk

सभेतील कमी गर्दीने मोदींचा तापलेला माथा पाहून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली !

News Desk

पुन्हा एकदा चंद्रशेखर रावच तेलंगणाचे मुख्यमंत्री

News Desk