HW News Marathi
राजकारण

भाजप सरकारला खडयासारखे बाजूला केल्याशिवाय गप्प बसायचे नाही !

मुंबई | “परिवर्तन हा निसर्ग नियम असून जे आपलं सरकार नाही त्या सरकारला खडयासारखं बाजूला केल्याशिवाय गप्प बसायचं नाही”, असा निर्धार व्यक्त विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. ते महाडच्या जाहीर सभेत बोलत होते. पहिली लढाई युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी जुलुमाविरोधी केली. आमचा निर्धार हुकुमशहाच्या विरोधात असल्याचे स्पष्ट करत केले आहे.

धनंजय मुंडे यांनी यावेळी शिवसेनेवर देखील सडकून टीका केली. नाव न घेता वाघ आणि बाईच्या प्रेमाची गोष्ट सांगत धनंजय मुंडे यांनी शिवसेनेला जोरदार टोला लगावला आहे. शिवाय शिवसेनेने वगाह्चे चिन्ह बदलून आता शेळीचे चित्र लावावे, असा खोचक टोलाही यावेळी धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन, राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे दर्शन घेवून निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेचा शुभारंभ झाला आहे. त्यानंतर ऐतिहासिक महाडच्या चवदार तळयावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाला अभिवादन करुन पहिल्या सभेची सुरुवात करण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माझ्या ‘त्या’ वक्तव्याचा विपर्यास केला गेला; पंकजा मुंडेंकडून संपूर्ण व्हिडिओ ट्वीट

Aprna

गडकरीच पंतप्रधान, ज्योतीषांनी वर्तविले भविष्य

News Desk

शाईफेकीच्या घटनेनंतर चंद्रकांत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Aprna