HW News Marathi
राजकारण

भाजपाच्या संपर्क फॉर समर्थनवर धनंजय मुंडेची टीका

पुणे | देशभरातली सामान्य जनता त्रस्त असताना भाजपाचे पक्षश्रेष्ठी त्यांचे दुःख जाणून घेण्याऐवजी प्रसिद्ध लोकांना भेटत आहेत. ते भलेही माधुरी दीक्षितला भेटले तर आम्ही शेत मजुराला भेटु, ते टाटाला भेटले तर आम्ही बाटा वापरणा-या सामान्य जनतेला भेटू, ते कपील देव ला भेटले तर आम्ही बळी देवराजाला भेटु अशा शब्दात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपाच्या संपर्क फॉर समर्थन अभियानावर जोरदार टीका केली आहे.

पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या 19 व्या वर्धापनदिनानिमित्त व पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल यात्रेच्या समारोप सभे निम्मित आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माधुरी दिक्षित, कपील देव, टाटा यांना भेटायला वेळ आहे पण महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला जायला वेळ नाही असा हल्लाबोल धनंजय मुंडे यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेच्या धमक्यांमुळे माझा भाजप प्रवेश रखडला !

News Desk

आज नांदेडमध्ये होणार राज ठाकरेंची पहिली जाहीर सभा

News Desk

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस

News Desk