HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्र्यांनी पवारांना भेटीसाठी वेळ दिली नाही ?

मुंबई | लोकसभा निवडणुकांमुळे राज्यातील भीषण दुष्काळ समस्येकडे सर्वच राजकीय पक्षांचे दुर्लक्ष झाले. मात्र, लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांनी देशातील या भीषण समस्येकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. राज्यातील या भीषण दुष्काळ स्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी सोमवारी (२७ मे) मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार होते. मात्र, मुख्यमंत्री कार्यालयाकडून अद्याप पवारांना भेटीसाठीच वेळ देण्यात आली नसल्याची माहिती मिळत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या नियोजित कार्यक्रमात व्यस्त असल्याने मुख्यमंत्री कार्यालयाकडून अद्याप शरद पवार यांना भेटीसाठी वेळ देण्यात आलेली नाही. राज्यातील भीषण दुष्काळस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी शरद पवार मुख्यमंत्रयांची भेट घेणार होते. केंद्रात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीची विनंती करणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब घेतले विठ्ठल-रखुमाईचे दर्शन

News Desk

शरद पवारांनी मतांच्या राजकारणासाठी कलम ३७० हटविण्यास विरोध केला !

News Desk

धार्मिक उन्मादातून मतांच्या धृवीकरणाचा रक्तरंजित ‘पॅटर्न राबविण्याचा प्रयत्न !

News Desk