HW News Marathi
राजकारण

नालायकांसाठी आपल्या जीवाची बाजी लावू नका !

राळेगणसिद्धी | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज (४ फेब्रुवारी) सहावा दिवस आहे. अण्णा हजारेंनी ३० जानेवारीपासून लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीच्या मागणीसाठीच्या आंदोलनाला सुरुवात केली. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अण्णा हजारेंची भेट घेण्यासाठी राळेगणसिद्धी येथे दाखल झाले आहेत. यावेळी राज ठाकरेंनी अण्णांच्या या उपोषणाला आपला पाठिंबा दर्शविला आहे. “केजरीवालांनीही इथे यायला हवे होते. नालायकांसाठी, ढोंगी लोकांसाठी आपल्या जीवाची बाजी लावू नका. अण्णांमुळेच हे सरकार सत्तेवर आले आहे”, असे संतप्त वक्तव्य राज ठाकरे यांनी यावेळी केले आहे.

कायदा करून ५ वर्षे उलटून गेली तरी सरकार लोकपाल नेमण्यास तयार नाही. जोपर्यंत लोकपालची नियुक्ती होत नाही तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नसल्याचे देखील अण्णांनी स्पष्ट सांगितले आहे. मात्र, या उपोषणामुळे अण्णांची प्रकृती खालावत आहे. अण्णा हजारेंच्या यकृतावर परिणाम झाला असून आता त्यांना रक्तदाबाचाही त्रास होऊ लागला आहे. त्यांचे उपोषण असे सुरु राहिले तर त्यांच्या किडनी आणि मेंदूवर देखील याचा वाईट परिणाम होईल, अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Chhattisgarh Assembly Elections 2018 : दुसऱ्या टटप्प्याच्या मतदानाला सुरुवात

News Desk

“अजित पवारांनी कोणत्या पुराव्यांच्या आधारे विधान केले, ‘ते’ सांगावे”, संभाजीराजेंचा सवाल

Aprna

नवनीत राणा-भाजपमधील संघर्ष चिघळणार ?

News Desk