HW News Marathi
राजकारण

आघाडीला गालबोट लागेल असे वक्तव्य करु नका !

बुलढाणा | “कोणत्याही परिस्थितीत मतांची विभागणी होऊ नये, यासाठी हा प्रयत्न करत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. आघाडीला गालबोट लागेल असे वक्तव्य करु नका. मोडता लगेच येते परंतु जोडताना दमछाक होते, त्यामुळे याचा विचार करा” असे आवाहन अजित पवार यांनी आपल्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना केले आहे.

हे भाजप सरकार बेरोजगारी वाढवत आहे, तुमच्या नोकर्‍या घालवत आहे, आधारभूत किंमत देत नाही, कापसाला दर देत नाही. ज्या सरकारला कामे करण्याची अक्कल नाही त्या सरकारकडून काय अपेक्षा करणार ?, असे विचारत अजित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचे सरकार आहे. मग आरक्षण मागणार्‍या समाजांना अद्याप न्याय का देत नाही ?, असा सवाल अजित पवार यांनी केला आहे.

“समृध्दी महामार्गाला राजमाता जिजाऊंचे नाव द्या, नाही दिले तर ही जनता तुम्हाला घालवल्याशिवाय राहणार नाही”, असे अजित पवार म्हणाले. “जर या सरकारने समृध्दी महामार्गाला जिजाऊंचे नाव दिले नाही तर आमची सत्ता आल्यावर आम्ही जिजाऊंचे नाव देऊ”, असे आश्वासन अजित पवार यांनी म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे !

News Desk

आठवलेंची आबा बागुल यांना ऑफर

swarit

“सुषमा अंधारे कोण?”, असा सवाल करत प्रताप सरनाईकांची टीका

Aprna
राजकारण

जाहीरनाम्यात राम मंदिराच्या मुद्द्याचा समावेश केलात तर तुम्हाला पाठिंबा देऊ !

News Desk

नवी दिल्ली | “तुमच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात राम मंदिराच्या मुद्द्याचा समावेश केलात तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ”, अशी ऑफर विश्व हिंदू परिषदेकडून काँग्रेसला देण्यात आली आहे.”राम मंदिरासाठी ज्यांनी खुले आश्वासन दिले त्यांना आम्ही पाठिंबा दर्शविला आहे. आहे. काँग्रेसने निवडणुकीच्या जाहीरनाम्यात राम मंदिराच्या मुद्द्याचा समावेश केला तर आम्ही काँग्रेला पाठिंबा देऊ”, असे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी म्हटले आहे. दरम्यान, विश्व हिंदू परिषदेच्या या ऑफरनंतर राजकीय वर्तुळात अनेक उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

सध्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी त्यांच्या सभांमध्ये देशातील रोजगार संधी आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर भाजपला अडचणीत टाकण्याच्या प्रयत्नात आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत देखील काँग्रेस याच दोन मुद्दे आपल्या जाहीरनाम्यात समाविष्ट करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता काँग्रेस भाजपची ही ऑफर स्वीकारणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Related posts

ममता या पश्चिम बंगालची संस्कृती, लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत !

News Desk

सावध व्हा नाहीतर निवडणूकीपूर्वी नसबंदीचा निर्णय सरकार घेईल | धनंजय मुंडे

News Desk

 मोदी विष्णूचा तेरावा अवतार तर शहा चाणक्य !

News Desk