HW News Marathi
राजकारण

आघाडीला गालबोट लागेल असे वक्तव्य करु नका !

बुलढाणा | “कोणत्याही परिस्थितीत मतांची विभागणी होऊ नये, यासाठी हा प्रयत्न करत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. आघाडीला गालबोट लागेल असे वक्तव्य करु नका. मोडता लगेच येते परंतु जोडताना दमछाक होते, त्यामुळे याचा विचार करा” असे आवाहन अजित पवार यांनी आपल्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना केले आहे.

हे भाजप सरकार बेरोजगारी वाढवत आहे, तुमच्या नोकर्‍या घालवत आहे, आधारभूत किंमत देत नाही, कापसाला दर देत नाही. ज्या सरकारला कामे करण्याची अक्कल नाही त्या सरकारकडून काय अपेक्षा करणार ?, असे विचारत अजित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचे सरकार आहे. मग आरक्षण मागणार्‍या समाजांना अद्याप न्याय का देत नाही ?, असा सवाल अजित पवार यांनी केला आहे.

“समृध्दी महामार्गाला राजमाता जिजाऊंचे नाव द्या, नाही दिले तर ही जनता तुम्हाला घालवल्याशिवाय राहणार नाही”, असे अजित पवार म्हणाले. “जर या सरकारने समृध्दी महामार्गाला जिजाऊंचे नाव दिले नाही तर आमची सत्ता आल्यावर आम्ही जिजाऊंचे नाव देऊ”, असे आश्वासन अजित पवार यांनी म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमचा शब्द पाळण्यासाठी तर भाजपचा शब्द जुमलेबाजीसाठी !

News Desk

राज्यसभेत निलंबित झालेल्या रजनी पाटील यांच्याकडे काँग्रेसने सोपवली ‘ही’ जबाबदारी

Aprna

मी सदैव लोकांबरोबर अन् लोकांसाठी कार्यरत राहीन !

News Desk