HW News Marathi
राजकारण

“सावरकरांबद्दल बोलायची राहुल गांधींची लायकी तरी आहे का?”, राज ठाकरेंची राहुल गांधींवर टीका

मुंबई। “वीर सावरकर यांच्याबद्दल बोलायची राहुल गांधींची लायकी तरी आहे का? “, असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर टीका करत केली. राज ठाकरेंनी आज (27 नोव्हेंबर) मुंबईतील नेस्को ग्राउंडवर मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा पार पडला आहे. या मेळाव्यात राज ठाकरेंनी राज्यपाला भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेले वक्तव्य, राहुल गांधींनी भारतो जोडो यात्रेदरम्यान वीर सावरकरसंदर्भात केलेले आक्षेपार्ह वक्तव्य, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदी मुद्यांवर मेळाव्यातून हल्ला बोल केला.
राज्यात भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी वीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानाचा राज ठाकरेंनी मेळाव्यात खरपूस समाचार घेत म्हणाले, “मध्यंतरी महाराष्ट्रात म्हैसूर सॅन्ड्रा सोप म्हणजे राहुल गांधी आले होते, असा उपहासात्मक टोला त्यांनी लगावला. पुढे राज ठाकरे हे राहुल गांधी टीका करत म्हणाले, “सावरकरांबद्द्ल वाटेल ते बरळून गेले. सावरकरांबद्द्ल तुम्हाला काय माहिती आहे?, राहुल गांधींची लायकी आहे का सावरकरांबद्दल बोलायची? अहो, सावरकरांनी जे केले तो रणनीतीचा भाग होता. जेलमध्ये सडण्यापेक्षा बाहेर येऊन मला जो लढा द्यायचा तो देऊ या. ही रणनीती ज्याला कळत नाही तो गुळगुळीत मेंदूचा”, असे म्हणत राज ठाकरेंनी राहुल गांधींवर निशाण साधला.
कोश्यारींकडून महाराष्ट्र समजून घेण्याची मराठी माणसाला गरज नाही
राज ठाकरेंनी राज्यापालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य राज ठाकरेंनी मेळाव्यात बोलताना म्हणाले, “राज्यातील उद्योग बाहेर जात आहे, यासंदर्भात बोलताना राज ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रातून इतके उद्योग गुजरातला चालला आहेत, ह्यावर धोतर (राज्यपाल कोशियारी) का नाही बोलले? गुजराती आणि मारवाडी महाराष्ट्रातून गेले तर महाराष्ट्राचे काय होईल, असे कोशियारी म्हणाले. यासंदर्भात राज ठाकरे राज्यपालांवर म्हणाले, “माझा प्रश्न आहे की मग गुजराती मारवाडी त्यांचे राज्य सोडून महाराष्ट्रात का आले?,” कोश्यारी म्हणतात, गुजराती-मारवाडी परतले तर मुंबईचे महत्त्व कमी होईल. कोश्यारी गुजराती-मारवाडी समाजाला विचारा उद्योगासाठी महाराष्ट्र का निवडला? कारण इथले उद्योगस्नेही वातावरण त्यांना आकर्षित करते. कोश्यारींकडून महाराष्ट्र समजून घेण्याची मराठी माणसाला गरज नाही.”
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केसीआर घेणार ममता बॅनर्जी यांची भेट

News Desk

…तर १ जूनला आम्ही नायर हॉस्पिटल बंद पाडू !

News Desk

“शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ मदत जाहीर करावी” अजित पवारांची सभागृहात मागणी

Aprna