HW News Marathi
राजकारण

डॉ.भागवतांनी सर्वांना फसवले | प्रकाश आंबेडकर

मुंबई | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने दिल्लीत भविष्यातील भारत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाची भूमिका सविस्तरपणे मांडलेली पहायला मिळाले. मात्र, यावेळी भागवतांनी सर्वांची फसवणूक केल्याचा आरोप भारिप बहुजन महासंधाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एका वृत्तवाहीनीच्या प्रतिनिधीशी बोलताना केला आहे. मोहन भागवत यांनी लोकांना पुन्हा फसविण्यासाठी आणि आम्ही बदललो आहोत, हे दाखविण्यासाठी इतर पक्षाच्या नेत्यांना बोलावले होते, असा आरोपही आंबेडकर यांनी केला आहे.

गोळवळकर गुरुजींचे ‘वी ऑर अवर नॅशनलहूड’ हे पुस्तक संघासाठी वंदनीय आहे. या पुस्तकात सर्वांनी हिंदू धर्म स्वीकारायलाच हवा, संघ सर्वोच्च असून संविधान दुय्यम आहे आणि वंदे मातरम हे देशाचे राष्ट्रगीत असावे, असे अनेक विचार या पुस्तकात मांडण्यात आले आहेत. मात्र, भागवतांनी कार्यक्रमात या पुस्तकातील मजकुराचे कोणत्याही प्रकारे खंडन केलेले नाही, असेही यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दोन नेते, दोन मेळावे, कोण गाजवणार मैदान?

Manasi Devkar

“संसदेच्या पावसाळी अधिवेशनात खुल्या मनाने संवाद साधायला हवा,” पंतप्रधानांचे खासदारांना आवाहन

Aprna

हिजड्याचे लग्न झाले तर त्याला मुले होतील, पण सिंचन योजना पूर्ण होणार नाही !

News Desk