HW News Marathi
राजकारण

पुढच्या कारवाईवेळी प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना विमानाखाली बांधून न्यावे !

नवी दिल्ली | ”पुढच्या वेळी जेव्हा भारताकडून अशी कारवाई करण्यात येईल तेव्हा असे प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना विमानाखाली बांधून न्यावे”, केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी केले आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने घडवून आलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाले. याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय वायू दलाने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला होता. मात्र, आता विरोधकांकडून या एअर स्ट्राईकचे पुरावे मागितले जात आहेत.

”पुढच्या वेळी जेव्हा भारताकडून कारवाई करण्यात येईल तेव्हा प्रश्न उपस्थित करणाऱ्या सर्वांना हवाई दलाने विमानाखाली बांधून सोबत न्यावे म्हणजे जेव्हा बॉम्बफेक होईल तेव्हा त्यांना पाहता येईल. त्यानंतर या सर्वांना तिथेच सोडावे यावे म्हणजे त्यांना या कारवाईत खात्मा झालेल्यांची संख्या देखील मोजता येईल”, असे व्ही.के.सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जे राम मंदिराला विरोध करतील त्यांचे देशामध्ये फिरणे कठीण होईल | संजय राऊत

News Desk

मतदान करणे हे आपले कर्तव्य, सर्वांनी आपले कर्तव्य बजावण्याची गरज | मोहन भागवत

News Desk

सध्या अण्णांचे प्राण वाचवा, पुढचे पुढे पाहू !

News Desk