HW News Marathi
राजकारण

मोदीजी लढाई संपली असून तुमची कर्म तुमची वाट पाहत आहे !

नवी दिल्ली | देशाच्या अनेक राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधूमाळी सुरू आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (४ मे) उत्तर प्रदेशमधील प्रतापगड आणि बस्ती येथील प्रचार सभेदरम्यान विरोधकांवर जोरदार टीका केली. यावेळी मोदींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीं यांच्यावर टीका करताना त्यांच्या वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. “माझ्या वडीलांवर टीका करुन तुम्ही वाचू शकणार नाही. मोदीजी लढाई संपली आहे, तुमची कर्म तुमची वाट पाहत आहे’, असे ट्वीट करत राहुल गांधी यांनीमोदींवर पलटवार केला आहे.”

मोदींनी प्रचारसभेत बोलताना बोफोर्स घोटाळ्यावरुन राजीव गांधींवर निशाणा साधला होता. ‘तुमच्या (राहुल गांधींच्या) वडिलांना त्यांच्या राज दरबारातील लोकांनी मोठा गाजावाजा करत मिस्टर क्लीन म्हटल होते. परंतु हळूहळू भ्रष्टाचारी नंबर वनच्या रुपात त्यांचे आयुष्य संपले. नामदार, हा अहंकार तुम्हाला खाऊन टाकेल. हा देश चुकीला क्षमा करतो. मात्र फसवणूक करणाऱ्याला कधीही माफ करत नाही,’ अशा शब्दांमध्ये मोदींनी राजीव गांधींवर अप्रत्यक्ष टीका केली होती.

राहुल गांधींपाठोपाठ काँग्रेस नेते सॅम पित्रोडा यांनी देखील मोदींनी राजीव गांधींवर केल्या टीकेला उत्तर देत त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. ‘मोदी काल (४ मे) राजीव गांधींबद्दल जे बोलले, त्यामुळे आम्हाला वेदना झाल्या आहेत. साधारणपणे पंतप्रधान देशाच्या लोकांसाठी बोलतात. ही एक मोठी जबाबदारी आहे. पंतप्रधानांनी बेताल वक्तव्य करू शकत नाही. परंतु काल पंतप्रधानांनी राहुल गांधींना तुमच्या वडील मृत्यूच्यावेळी एक नंबरचे भ्रष्ट होते असे म्हणाले. मोदींच्या या विधानाची आम्हाला लाज वाटते,’ अशा शब्दांमध्ये पित्रोडांनी मोदींवर टीकास्त्र सोडले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजकारणातही नौटंकी होत असते !

News Desk

गोपाळ शेट्टी राजीनामा देणार का ?

News Desk

OBC आरक्षणासंदर्भात राज ठाकरेंनी दिली पहिली प्रतिक्रिया…

Aprna