HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : रमजान महिन्यात येणाऱ्या तारखांना मुस्लिम धर्मगुरूचा आक्षेप, आयोगाचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली | निवडणूक आयोगाने काल (१० मार्च) लोकसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. ११ एप्रिल ते १९ मे रोजी दरम्यान देशभरात सात टप्प्यात लोकसभा निवडणुका घेण्यात येणार आहे. शेवटच्या टीन टप्प्यात उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहार या तीन राज्यात मतदान होणार आहेत. या तिन्ही राज्यात मुस्लिम मतदारांच्या संख्येचे प्रमाण जास्त आहे.

त्यामुळे निवडणुकीच्या दरम्यान रमजान महिन्यात ठेवल्याने मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यात असल्यामुळे मतदानाच्या तारखा बदलण्यात याव्या अशी मागणी मुस्लिम धर्मगुरुनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. शेवटच्या तीन टप्प्यात म्हणजे ६, १२ आणि १९ मे रोजी मतदान होणार आहे. या तिन्हीही तारखा रमजान महिन्यात येतात.

निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

या काळात मुस्लिम धर्मियांचा उपवास असतो. त्यामुळे मतदानाचा टक्का घसरु शकतो असे मुस्लिम धर्मगुरुंचे म्हणणे आहे. परंतु निवडणुका या ईद आणि रमजानच्या महिन्यातील कोणत्याही शुक्रवारच्या दिवशी मतदान ठेवण्यात आली नाही, असे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

घाम गाळून पिकवलेला कांदा ‘आत्मघातकी’ ठरत आहे !

News Desk

“राष्ट्रवादीचा एक मोठा नेता लवकरच देशमुख आणि मलिकांना भेटणार”, कंबोज यांचे खळबजनक ट्वीट

Aprna

भाजपकडून प्रचारासाठी ‘सर्जिकल स्ट्राईक’चा पुरेपूर वापर, निवडणूक आयोगाचे नियम पायदळी

News Desk