HW News Marathi
राजकारण

पवारांनी मोदींची कितीही बाजू घेतली तरी काही फरक पडणार नाही | संजय राऊत

मुंबई | राफेल प्रकरणात राहुल गांधी ज्याप्रकारे सत्य बाहेर आणत आहेत. त्यामुळे ते देशात मोदींनंतर मोठे नेते झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची दखल घेतली जातेय. राफेल प्रकरणामुळे देशाच्या मनात अस्वस्थता आहे. पवारांनी मोदींची कितीही बाजू घेतली तरी काही फरक पडणार नाही. तसेच राफेल प्रकरणात विरोधी पक्षातील इतर घटक पक्षांचे नेते अजून गप्प का ? असा सवाल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलतांना उपस्थित केला.

भाजप आणि मोदींच्या बाजूने उभा राहिलेला आशादायी सूर, पण तो फार काळ टिकणार नाही. राफेल वरील शरद पवार यांचे विधान हे भाजप आणि मोदींना तात्पुरती मदत आहे. त्यामुळे भाजपनं संयम बाळगावा फार आरोळ्या ठोकू नयेत. बोफोर्सचा अनुभव लक्षात घ्यावा. तसेच महिनाभराने पवारांचे खरे मत बाहेर येईल. असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

यावेळी बोलतांना संजय राऊत पुढे म्हणाले, गेल्या चार वर्षांत दिसलं कि जेव्हा नरेंद्र मोदी अडचणीत येतात असे दिसते तेव्हा पवार मध्य भूमिका घेण्याचा प्रयत्न करतात. तसेच २०१४ ला राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप-राष्ट्रावादी मध्ये ठरवून सगळे झालं. प्रफ्फुल पटेल यांचं राष्ट्रवादीने भाजप सरकारला पाठिंबा देण्याचं विधान हे त्या ठरवलेल्या रणनीतीचा भाग होता. असे देखील संजय राऊत म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राफेल प्रकरणाबाबत मोदींची कथित स्वरूपात पाठराखण करण्याचा प्रयत्न समोर आला असतानाच राष्ट्रवादी पक्षानं पवारांच्या भूमिकेवर स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच शरद पवारांनीराफेल करारावरून पंतप्रधान मोदींना क्लीन चिट दिली नसल्याचंही राष्ट्रवादीनं सांगितलं आहे. पण शिवसेनेनं कुठेही अजून वेगळी भूमिका घेतलेली नाही. प्रकरण प्राथमिक अवस्थेत आहे. JPC ची मागणी झालीय. शिवसेनेनं कुणाला क्लीनचिट दिलेली नाहीये. शिवसेना लोकभावनेसोबत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात आलेले पहिले उत्तर भारतीय प्रभू राम होते !

News Desk

प्रेक्षक गॅलरीतून दिसणारे मुंबईचे दृश्‍य डोळ्याचे पारणे फेडणारे !

News Desk

काँग्रेसला मतदान केल्यास भाजपला मतदान, सुशीलकुमार शिंदेंचाही आरोप

News Desk